हिंदूंची लोकसंख्या घटणार! 2050 पर्यंत 'इतकी' कमी होणार, आकडेवारी आश्चर्यचकित करणारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : सध्या जगाची लोकसंख्या 800 कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांची संख्या अनुक्रमे 200 कोटींहून अधिक असून, हिंदू धर्मीयांची लोकसंख्या 100 कोटींच्या पुढे आहे. मात्र, अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार हिंदू धर्माच्या लोकसंख्येत आगामी काळात घट होण्याची शक्यता आहे.
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, 2050 पर्यंत हिंदू धर्माची लोकसंख्या सध्याच्या तुलनेत 0.3 टक्क्यांनी कमी होईल. 2010 मध्ये हिंदू धर्मीयांची संख्या 1.03 अब्ज होती. ही संख्या 2050 पर्यंत 1.38 अब्जपर्यंत पोहोचेल. मात्र, ही वाढ तुलनेने खूपच कमी असल्याने हिंदू धर्मीयांची जागतिक लोकसंख्येतील टक्केवारी कमी होणार आहे.
अहवालात म्हटले आहे की 2050 पर्यंत जगातील बहुतेक प्रमुख धर्मांची लोकसंख्या वाढेल. ख्रिश्चन धर्म 2050 पर्यंत जगातील सर्वात मोठा धार्मिक गट राहील, तर इस्लाम 2070 पर्यंत ख्रिश्चन धर्माला मागे टाकून जगातील प्रमुख धर्म बनेल.
सध्या हिंदू धर्म जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, हिंदू धर्माच्या लोकसंख्येत होणाऱ्या तुलनात्मक घटेमुळे भविष्यात त्याचे स्थान कमी होण्याची शक्यता आहे.
नवराष्ट्र विशेष बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस म्हणजे कल्पनांच्या आकाशात भविष्याचा शोध
जगभरात कोणत्याही धर्माच्या लोकसंख्येच्या वाढीसाठी जन्मदर हा महत्त्वाचा घटक असतो. उच्च जन्मदरामुळे अनेक धर्मांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्यूच्या अहवालानुसार, हिंदू धर्मीयांचा जन्मदर तुलनेने कमी असल्याने लोकसंख्या घटण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
प्यूच्या अहवालात 2050 पर्यंत हिंदू धर्माच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता दर्शवली आहे. 2010 मध्ये हिंदू धर्मीयांची जागतिक लोकसंख्या 15.2% होती. ती 2050 पर्यंत 14.9% पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेने चुकूनही भारताविरोधात उचलले ‘हे’ पाऊल तर होईल मोठे नुकसान; ‘ट्रेड, टॅरिफ आणि ट्रम्प’ (RIS) चा इशारा
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालाने हिंदू धर्माच्या भवितव्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 2050 पर्यंत होणारी ही लोकसंख्या घट केवळ आकडेवारीतील फरक नसून, हिंदू धर्माच्या अस्तित्वासाठीचा इशाराही आहे. त्यामुळे हिंदू धर्म टिकवण्यासाठी आणि त्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.






