पर्यटन हंगाम सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. वर्षातील अवघे दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगीचे मानले जातात, मात्र याच काळात सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठी गदा आली आहे. सीएनजी पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून, अनेक रिक्षाचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी गॅस संपल्याने रिक्षा बंद ठेवण्याची वेळ चालकांवर आली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्षाचालकांनी प्रशासनाकडे तातडीने सीएनजी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, पर्यटन हंगामात अशा प्रकारचा तुटवडा होणे हे नियोजनातील अपयश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पर्यटन हंगाम सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. वर्षातील अवघे दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगीचे मानले जातात, मात्र याच काळात सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठी गदा आली आहे. सीएनजी पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून, अनेक रिक्षाचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी गॅस संपल्याने रिक्षा बंद ठेवण्याची वेळ चालकांवर आली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्षाचालकांनी प्रशासनाकडे तातडीने सीएनजी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, पर्यटन हंगामात अशा प्रकारचा तुटवडा होणे हे नियोजनातील अपयश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.






