सतत तोंड येऊन हिरड्या जिभेवर लालसर फोड येतात? शरीरात वाढलेल्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
वारंवार तोंड येण्याची कारणे?
तोंडात येणाऱ्या जखमांवर घरगुती उपाय?
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे तोंड येते?
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरसंबंधित असंख्य समस्या वाढू लागतात. त्यातील अतिशय सामान्य समस्या म्हणजे तोंड येणे किंवा जिभेवर लालसर फोड येणे. जिभेवर, ओठांच्या आतील बाजूस किंवा हिरड्यांवर छोटे पांढरे किंवा लालसर फोड काहीवेळा खूप जास्त वेदनादायी वाटतात. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे जिभेच्या आतील भागात वेदनादायी फोड येतात, ज्याच्या परिणामामुळे काही खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. पाणी पिताना सुद्धा खूप जास्त त्रास होतो. जिभेवर किंवा ओठांच्या आतील भागात वारंवार फोड येत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. हे फोड केवळ कमी पाण्याच्या सेवनामुळे नाहीतर शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे, पोषक घटकांचा अभाव, झोपेची कमतरता, पोषणतत्त्वांची कमतरता किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे तोंडात फोड येण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया तोंड आल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
तोंडात आलेले लालसर फोड कमी करण्यासाठी सर्वप्रथम नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी कोमट पाणी किंवा डिटॉक्स वॉटर प्यावे. यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि आतडे स्वच्छ होतात. तोंडात झालेल्या जखमांमुळे जळजळ वाढल्यास पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. यामुळे जखमेवरील जंतू नष्ट होतात आणि जखम भरण्यास मदत होईल.
हिंदू धर्मात तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे. तुळशीच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे तोंडात वाढलेला संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते आणि जखम लवकर सुकून जाते. यासाठी ३ ते ४ तुळशीची पाने घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर तोंडात चघळा. यामुळे तोंडात आलेले फोड, जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होईल.
दैनंदिन आहारात सतत तिखट, तेलकट किंवा अतिप्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यामुळे तोंडात जखमा किंवा हिरड्यांना फोड येण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी मधाचा वापर करावा. मध लावल्यास तोंडात आलेल्या जखमा कमी होऊन आराम मिळतो. याशिवाय मध हे खूप जास्त उष्ण असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात मधाचा वापर करावा. तोंडात आलेल्या जखमांमुळे खूप जास्त आग किंवा जळजळ होत असेल तर दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या आणि थंड पदार्थांचे सेवन करावे.
तोंडात आलेले फोड २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस तसेच राहिल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. कारण तोंडाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तोंडात जखमा होणे, तोंड येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय शरीरात विटामिन बी१२, फॉलिक अॅसिड किंवा लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर सुद्धा फोड येण्याची शक्यता असते. भरपूर पाणी आणि शरीरास आवश्यक असलेला आहार घेतल्यास शरीर कायमच हेल्दी राहील.
Ans: काही लोकांना शरीरात उष्णता वाढल्यास तोंडात जळजळ किंवा फोड जाणवू शकतात. मात्र तोंड येण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.
Ans: पुरेसे पाणी प्यावे, तिखट-आंबट पदार्थ कमी करावेत, तोंडाची स्वच्छता राखावी आणि संतुलित आहार घ्यावा.
Ans: हिरड्यांची जळजळ, संसर्ग, तोंडाची योग्य स्वच्छता न राखणे किंवा पोषणातील कमतरता यामुळे अशी समस्या होऊ शकते.






