लहान मुलांना त्यांचे पालक सांगतात की, बाहेर जाऊ नकोस , मातीत खेळू नकोस किंवा चिखलात जाऊ नकोस पण मुलांना असं सतत मागे खेचल्याने मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते असं डॉक्टर सांगतात. तज्ज्ञ असं सांगतात की, प्रत्येक वेळेस तुमच्या मुलांना बाहेर खेळण्यापासून विशेषत: मैदानी खेळ खेळण्यापासून थांबवू नका. मग अशावेळी पालकांनी करावं तरी काय ?
डॉक्टरांच्या मते, अतिस्वच्छता ही पालक आणि मुसांसाठी अत्यंत चुकीचं आहे. जोवर मुलं किटक आणि घाणीच्या संपर्कात येत नाही तोवर त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढत नाही. यामुळे पालक म्हणून तुम्ही मुलांना भक्कम होण्यापासून मागे खेचता. जेव्हा मुलं बरबटून खात असतात किंवा मातीत खेळतात तेव्हा होतं काय तर त्यांचं शरीर बॅक्टेरियापासून लढण्यासाठी तयार होत असतं. मुलं जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, खेळतात, हातात हात घेतात तेव्हा सर्दी ताप यांचं संक्रमण होत असतं. अशा वेळी सतत सुट्टी घेऊन मुलांना घरी न ठेवता त्यांना त्या छोट्या छोट्या आजाराशी सामना करायला शिकवायला पाहिजे.
आता पालक म्हणून तुम्हाला असं वाटूच शकतं की मुलांना स्वच्छतेचं महत्व सांगायचं नाही का ? तर मुलांना लहानपणापासून स्वच्छता शिकवली पाहिजेच पण अतिस्वच्छता म्हणजे कोणालाही हात लावणं, कोणाशी डब्बा शेअर न करणं किंवा खेळायला न जाणं यामुळे मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे मुलांच्य़ा चांगल्या आरोग्यासाठी त्य़ांना मनसोक्त मातीत खेळू द्या. त्यांना समुद्राच्या लाटा अंगावर झेलू द्या. त्यामुळेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे.






