बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
जीवनशैलीतील बदलांचा आरोग्यावर होणारा परिणाम?
फिजिओथेरपी कशासाठी केली जाते?
फिजिओथेरपी केल्यामुळे दिसून येणारे बदल?
Physiotherapy: दिवसभर लॅपटॉप,संगणकासमोर बसणे, मोबाईलचा वाढता वापर आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना मानदुखी, पाठदुखी, खांदेदुखी तसेच सांधेदुखीच्या तक्रारी जाणवतात. दुखापत किंवा शस्त्रक्रियेनंतरही शरीराची हालचाल पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपीची गरज भासते. अशा वेळी केवळ वेदना कमी करण्याबरोबरच शरीराची ताकद आणि हालचाल सुधारण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची ठरते. दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा केला जातो. शारीरिक हालचाल सुधारण्यास, शारीरीक हलचालींवर येणाऱ्या मर्यादा कमी करण्यास आणि जीवनमान सुधारण्यास फिजिओथेरपीचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित केले जाते. याविषयी आशु शिशोदिया, विभाग प्रमुख – फिजिओथेरपी आणि पुनर्वसन, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
फिजिओथेरपीचा उपयोग केवळ वेदना कमी करण्यापुरता मर्यादित नाही तर स्नायूंची बळकटी आणि लवचिकता वाढवणे, शारीरीक समतोल सुधारणे, योग्य शारीरीक स्थिति राखणे आणि सांध्यांची हालचाल सुरळीत करणे यासाठीही फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. दुखापत, आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा दैनंदिन कामांकडे परतण्यासाठीही त्याची मदत होते.
विशेषतः ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन, क्रीडा दुखापती, न्यूरोलॉजिकल समस्या तसेच दीर्घकाळ जाणवणाऱ्या वेदनांमध्ये फिजिओथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. रुग्णाच्या गरजेनुसार तयार केलेला व्यायामाचा कार्यक्रम आणि जीवनशैलीतील योग्य बदल यामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक प्रभावी होऊ शकते.
फिजिओथेरपी म्हणजे केवळ वेदना कमी करण्याचा उपचार नाही. शरीराच्या हालचालींमधील अडचणी आणि स्नायूंची कमतरता ओळखून रुग्णाची ताकद, हालचाल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि योग्य व्यायाम केल्यास पुनर्वसन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
दीर्घकाळ वेदना जाणवत असतील किंवा हालचालींमध्ये अडथळा येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःहून औषधे किंवा व्यायाम करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य फिजिओथेरपी करणे अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरू शकते. नियमित हालचाल ही निरोगी शरीराची गरज आहे. योग्य फिजिओथेरपीमुळे वेदनांवर नियंत्रण मिळवण्यासोबतच सक्रिय आणि स्वावलंबी जीवनाकडे पुन्हा वाटचाल करता येते.
Ans: बैठी जीवनशैली, तासन्तास बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, चुकीची पोस्चर आणि वाढता ताण यामुळे मान, पाठ, खांदे आणि सांध्यांशी संबंधित तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे काही लोकांमध्ये फिजिओथेरपीची गरज वाढू शकते.
Ans: दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, मानदुखी, स्नायूंमध्ये ताण, stiffness आणि हालचालींमध्ये मर्यादा जाणवू शकतात.
Ans: दुखापतीनंतरचे पुनर्वसन, स्नायू-सांध्यांच्या समस्या, हालचालींची मर्यादा, काही पाठदुखी किंवा मानदुखीच्या समस्यांमध्ये फिजिओथेरपी उपयोगी ठरू शकते.






