कारणांचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक
शेतकरी आत्महत्येमागे केवळ एकच कारण असते असे नाही. शेतीतील नुकसान, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींसोबत कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची चौकशी करताना सर्व संबंधित बाबींचा संवेदनशीलपणे विचार होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये ५६ आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी ३२ प्रकरणे पात्र ठरली होती. २०१६ मध्ये ५४ पैकी ४१ प्रकरणे पात्र ठरली. मात्र २०२३ मध्ये ५६ पैकी केवळ १४ आणि २०२४ मध्ये ६० पैकी १३ प्रकरणे पात्र ठरली.
एक लाखाची मदत, मात्र निकषांची कसोटी कायम
पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये वारसांना शासनाकडून एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. जिल्ह्यात २००३ ते २०२४ या कालावधीत पात्र ठरलेल्या ३०५ प्रकरणांसाठी एकूण ३०५ लाख रुपये, म्हणजेच ३ कोटी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची नोंद आहे. २०२५ मध्ये ५० आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी १४ प्रकरणे पात्र ठरली, तर ३६ प्रकरणे अपात्र ठरली. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत १० आत्महत्यांची नोंद झाली असून त्यापैकी २ प्रकरणे पात्र आणि ८ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.
५ सयमानुसार प्रत्येक प्रकरणाची रितसर चौकशी तसेच संबंधित कागदपत्रांची केल्यानंतरच पडताळणी निर्धारित निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र प्रकरणांना आर्थिक मदत दिली जाते. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या १० प्रकरणांपैकी पात्र ठरलेल्या प्रकरणांतील कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे.- मनोहर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा
अपात्रतेची कारणे काय ?
शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर घटना शासकीय मदतीसाठी निर्धारित निकषांमध्ये बसते का, याची चौकशी केली जाते. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जफेडीचा तगादा हे पात्रतेच्या तपासणीतील प्रमुख निकष आहेत. आत्महत्येचा संबंध या निकषांशी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास प्रकरण मदतीस पात्र ठरते. याउलट आत्महत्येचे कारण निर्धारित निकषांशी संबंधित नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास प्रकरण अपात्र ठरू शकते. महसूल आणि पोलिस यंत्रणेकडून शेतीची स्थिती, कर्जाची माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि आत्महत्येच्या कारणांचा तपास केला जातो. त्यानंतर प्रकरणाची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडते.
धान उत्पादक शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी धान पिकावर अवलंबून आहेत. मात्र वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता, नापिकी, कर्जाचा भार, धानाच्या विक्रीतील अडचणी आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे शेतीचे अर्थकारण अनेकदा अडचणीत येते.






