७५ वर्षांवरील नागरिकांना साध्या आणि निमआराम बसेसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवासाची सोय आहे. तर ६५ ते ७५ वयोगटातील प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते.
राज्यभरात गेल्या काही काळामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आशा दुर्दैवी घटना घडत असतानाच भंडारा जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा शहराजवळील बेला इथे घडली आहे.
तालुकास्तरीय समित्यांनी केलेल्या फेरतपासणीत 17183 अर्ज अपात्र ठरले असून, 282788 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना अंमलात आणली गेली.
मार्च 2024 मध्ये निधीने तिच्या भावाला या त्रासाबद्दल सांगितले व माहेरी जाऊन राहिली. काही महिन्यानंतर ती सासरी परत गेली. परंतु तिचा मानसिक छळ सुरूच राहिला.
बेटाळा रेती घाट डेपोच्या नावाने अधिकृत असला तरी प्रत्यक्षात येथे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरी सुरू आहे. रविवारी सकाळी नदी पात्रातून अवैध रेती उपसा सुरू होता.
एका व्यक्तीला एसटीला सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी साध्या गाडीने 92 रुपये, शिवशाही 133 रूपये, तर शिवाईला 125 रूपये आणि 145 रुपये मोजावे लागत आहेत. तर दुचाकीने एवढ्याच अंतरासाठी 105 रुपयांत दोघांना प्रवास होत आहे
भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचला, ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. स्फोटानंतर भीषण आग लागली आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते.
ग्रामसेवक संजय गहाने यांच्या फिर्यादीवरून लोकेश एकनाथ भेंडारकर (रा.विरली-बूज) याच्याविरोधात लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामसेवक संवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमेश दुचाकीने लाखनीकडून भंडाऱ्याकडे जात होता. दरम्यान, त्याची दुचाकी एका स्कूटीला मागून धडकली. दुचाकीसह रस्त्यावर पडून उमेश यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
भंडारा जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ही मुदत संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.