वरठीजवळील एकलारी येथे जिल्हा परिषद शाळेसमोर जिवंत वीजतार तुटल्याने तीन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वीच शाळा सुटल्याने विद्यार्थी बालंबाल वाचले, मात्र महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील कोरंभी बायपासवर रविवारी पहाटे दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पुना नायक (३७, रा. ओरिसा) या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलकी आल्याने कोळशाच्या ट्रकने लोखंडी सळाखी वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
भंडारा जिल्ह्यातील ७९४ जिल्हा परिषद शाळांपैकी शेकडो इमारती जीर्ण आणि धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निधी मंजूर असूनही दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने पालकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
भंडारा जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाची धडक तपासणी मोहीम आणि तीव्र उन्हाळ्यामुळे गेल्या तीन महिन्यांत दूध संकलनात मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रशासनाने गोळा केलेल्या सर्व ४९ नमुन्यांची गुणवत्ता योग्य असल्याचे समोर आले असून जिल्ह्यात दुधातील भेसळीचे प्रमाण निरंक आढळले आहे.
भंडारा बसस्थानकावरील २७ वर्षे जुनी 'संत लहरी बाबा जल आशिष' पाणपोई प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाच्या या अनास्थेविरोधात प्रवासी आणि समाजसेवकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भंडारा मध्ये ऑगस्टपासून पशुधनासाठी लाळखुरकुत (FMD) प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची ९ वी फेरी राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन केले जाणार असून, एनडीएलएम पोर्टलवर लसीकरणाची नोंद करणाऱ्या खाजगी तंत्रज्ञांना प्रति पशुधन ₹५ प्रोत्साहन अनुदान दिले जाईल.
परीक्षा काळात शिक्षकांवर वाढलेल्या अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे शालेय शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शासकीय कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशाला ६० टक्क्यांहून अधिक एलपीजी आखाती देशातून आयात करावा लागतो. युद्धामुळे गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० ते ८० रुपयांची वाढ झाली.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मयदिपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र ही मदत मिळवण्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल. मात्र, फेब्रुवारी महिना संपत आला तरी आर्थिक तरतुदीतील काही तांत्रिक पेच किंवा प्रशासकीय धोरणात्मक निर्णयामुळे ही प्रक्रिया रखडली आहे.
विशेष म्हणजे, हा भाग राज्याच्या दोन बड्या राजकीय नेत्यांचा बालेकिल्ला मानला जातो. इटाण हे गाव काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव आहे.
७५ वर्षांवरील नागरिकांना साध्या आणि निमआराम बसेसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवासाची सोय आहे. तर ६५ ते ७५ वयोगटातील प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते.