(फोटो सौजन्य-AI एआय)
राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर असलेली बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल सहा वर्षे उलटूनही नियमित शिक्षक भरती न झाल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ९१० शिक्षकांची पदे अद्याप रिक्त आहे. याशिवाय जिल्ह्यातील तब्बल २८८ शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून, पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर (पीटीआर) नियमानुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात येते. या निकषानुसार मंजूर असलेल्या पदांपैकी जिल्ह्यात सध्या ९१० पदे रिक्त आहे.
२०१९ मध्ये ‘पवित्र’ पोर्टल सुरू करून भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. राज्यभरातील सुमारे पावणेदोन लाख डीएड व बीएडधारक उमेदवारांनी ही परीक्षा दिली.
मात्र, त्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांनाच नियुक्त्या देण्यात आल्या. सध्या कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी रिक्त पदांचे रोस्टरही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नव्या शिक्षक भरतीबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. केवळ २ हजार ६१७ पदांवर शिक्षक कार्यरत असून ९१० पदे रिक्त आहे. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकाला सर्व वर्गाचा कारभार सांभाळावा लागत आहे.
शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यात यावी, खासगी शाळांप्रमाणे गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण द्यावे, प्रत्येक पालक खासगी शाळांला मुलांचा प्रवेश घेऊ शकत नाही. त्यामुळे शासन प्रशासनाने जिप शाळांमध्ये उत्तम सुविधा देण्यावर भर द्यावा.
राजकुमार भाजीपाले, पालक, झांजिया. पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शाळा बंद झाल्यास तेथील शिक्षकांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यात येणार आहे। चोथे रिक्त जागा उपलब्ध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, शिक्षकांची रिक्त पदे ‘पवित्र’ पोर्टलद्वारे भरण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. – पवन, खंडारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया.
खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी; बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला
अनुदानित शाळा, अनुदानित व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त पदांचा विचार करता ५० हजारांहून अधिक शिक्षकांची कमतरता असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ५२७ शिक्षकांची पदे मंजूर आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब, सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षक भरतीला प्राधान्य द्यावे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. यशोधरा सोनेवाने, अध्यक्ष, म. रा. प्रा. शिक्षक संघ.
जि.प. शाळांमध्ये कॉन्व्हेंटच्या शासन प्रशासनाने करावा. गोरगरीब पालकांना खासगी शाळांत मुलांना शिकविणे आवाक्याबाहेर असते. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भ्ररण्यात यावी, दर्जेदार शिक्षण देण्यात यावे, अशी अपेक्षा आहे. देवेंद्र दमाहे, पालक, भडंगा.






