Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार; राजू शेट्टींचा इशारा

महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने प्रलंबित निर्णय घेतला नसल्याने २५ नोव्हेंबरला राज्यभरात स्वाभिमानी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2022 | 06:46 PM
२५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार; राजू शेट्टींचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने प्रलंबित निर्णय घेतला नसल्याने २५ नोव्हेंबरला राज्यभरात स्वाभिमानी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी जालंधर पाटील, सावकार मादंनाईक, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मंत्र्यांना आता मैदानातच जाब विचारला जाईल. १०० खोके घालूनही सरकार येऊ देणार नाही, असा गर्भित इशाराही दिला. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यमार्गावरही आंदोलन केलं जाणार आहे. अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्ग बंद ठेवू, असेही ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक व साखर उद्योगामध्ये पसरलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीत ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर जिल्ह्यात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.

या मागण्यांकडे लक्ष वेधले

कोल्हापूर मार्गावर ट्रॅक्टरमधून सुरु असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत, आदींसह अन्य मागण्यांकडे स्वाभिमानीने लक्ष वेधले.

दोन दिवस ऊसतोड बंद

ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यातील एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनात यासाठीचा कायदा मंजूर करावा, एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी, या प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात आले होते.

Web Title: Chakkajam protest will be held across the state on november 25 raju shettys warning nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 06:46 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • kolhapur
  • Raju Shetti
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू
4

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.