पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार! (Photo Credit- AI)
पैठण तालुक्यातील पैठण शहरासह, आपेगाव, नवगाव, पाचोडसह थेरगाव, दादेगाव हजारे, कुतुबखेडा, वडजी, नांदर, हर्षी, दावरवाडी, कडेठाण परिसरात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात काही ठिकाणी पावसासोबत गारपीट झाली त्यामुळे उन्हाळी फळासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. समोवारी संध्याकाळी आकाशात काळेकुट्ट ढग येऊन वादळी वाऱ्यास जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला.
गारा अन सोबत विजेचा कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज गुल झाली होती. झाडे, उन्मळून पडली. या पावसाच्या फटक्यामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसला. तालुक्यात ठिकठिकाणी लिंबाचे वडाचे झार्ड कोसळल्याचे घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही. शेतकऱ्यांच्या आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा अक्षरशः सडा पडला तसेच जनावरांचे गोठ्यांचे पजे उडाली. चाळीचे नेट जमीनदोस्त झाल्या तसेच विजेचे खांब वाकल्या.
Amravati News : शेतकरी पुन्हा विळख्यात! जिल्ह्यात सावकारीचे वाढतेय ‘महाजाल’, तब्बल कोटींचं कर्जवाटप
ठिकठिकाणी झाडांच्या फाद्या तुटून पडल्या. याच बरोबर रस्त्यांवरील खड्यात आणि सखल भागामध्ये पाणी साचले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पीके आडवी झाली. अनेक भागांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाची शेत पिकांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हाती आलेल्या पिकाचे व शेतमालाचे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. या धक्क्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच शेतकरी पुढे अवकाळी अस्मानी संकट उभे आले आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी या ऋतूमध्ये दिवसभरात उन्हाळा पहावयास मिळतो तर रात्रीच्या वेळी पावसाळा पहावयास मिळत आहे. अशा या वातावरणामध्ये या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक संकटाचा फटका आंब्यासह उन्हाळी भुईमुग, कांदा, बाजरी जनावरांच्या चा-याला बसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहेत. गतवर्षीच्या अवकळी पावसाच्या संकटातून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकळी पावसाने तडाका दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी पार कोलमडून पडला आहे. सध्या आंब्यांला लागलेल्या कैऱ्या वादळी तडाक्याने गळून पडल्या आहे तर टरबूज खरबूज काकडी, खिरे, कांदा इतर उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मात्र मिळाला, परंतु मोठे नुकसान झाले.






