छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! (Photo Credit- AI)
महापालिकेकडून नियमित अतिक्रमण हटाव कारवाई होत असली तरी पथक परतल्यानंतर काही तासांतच अतिक्रमणे पुन्हा होत असल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळे बाजारपेठांतील वाहतूक कोंडी वाढत असून पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून निवडक मार्गावर दिवसभर गस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगपुरा, गुलमंडी, पैठण गेट, शहागंज, सिटी चौक, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, गजानन महाराज मंदिर परिसर आदी भागांत रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत.
दुकानांसमोर ओटे, वाहनांचे पार्किंग आणि हातगाड्यांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी कमी होत असून, गदींच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावतो. प्रत्येक गस्ती पथकात पाच कर्मचारी असतील. अतिक्रमण होताच तत्काळ कारवाई करून ते पुन्हा उभे राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित पथकावर असेल.
८ वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा होत असल्याने सातत्यपूर्ण गस्तीची व्यवस्था उभारली जात आहे. अतिरिक्त कर्मचारी मिळाल्यानंतर ही यंत्रणा तातडीने सुरू करण्यात येईल. – संतोष वाहुळे, नियंत्रण अधिकारी, अतिक्रमण हटाव विभाग, महापालिका
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील अन्य प्रमुख मार्गांवरही टप्प्याटप्याने ही व्यवस्था लागू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, गस्ती पथकांसाठी २० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. मनुष्यबळ उपलब्ध होताच पथके कार्यरत केली जातील. गस्ती पथकांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २० कर्मचारी मिळाल्यानंतर पाचही पथके प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतील. प्रत्येक पथकाला स्वतंत्र वाहन देऊन सकाळपासून रात्रीपर्यंत संबंधित मार्गावर सातत्याने गस्त ठेवली जाणार आहे.
पैठण गेट – गुलमंडी
शहागंज पोस्ट ऑफिस परिसर
महात्मा गांधी पुतळा चेलीपूरा
गजानन महाराज मंदिर परिसर
मुकुंदवाडी परिसर
रोशन गेट कटकट गेट
चिश्तिया चौक बळीराम पाटील विद्यालय –
-क्रांती चौक रेल्वे स्टेशन
औरंगपुरा – चंपा चौक
रेल्वे स्टेशन पैठण गेट –
जटवाडा रोड
रेल्वे स्टेशन – हसूल रोड






