अक्कलकोट : आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, . मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटिबध्द आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अक्कलकोट दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट दिली. श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी आ. सुभाष बापू देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, आ. राजाभाऊ राऊत, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपअधीक्षक विलास यामावार, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक महेश स्वामी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, गोकुळ शुगर्सचे चेअरमन दत्ता शिंदे, कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी, गवंडी समाज अक्कलकोट तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवंडी, उद्योगपती शैलेश राठौर, वैजूनाथ मुकडे, श्रीशैल गवंडी, माजी नगरसेवक यशवंत धोंगडे, रामचंद्र समाणे, राजाभाऊ झिंगाडे, ॲड.विजय हर्डीकर, मनोज इंगुले, संतोष कलबुर्गी, नितीन कटारे, शिवशंकर स्वामी, स्वप्निल गायकवाड, सुनील पवार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, रवी मलवे, विपूल जाधव आदी उपस्थित होते.