फोटो सौजन्य - Social Media
नीता परब, मुंबई : पावसाळा तोंडावर आलेला असतानाही मतदारसंघातील अत्यावश्यक नागरी कामे रखडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांनी थेट मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची मंगळवारी भेट घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाळ्यात हालअपेष्टा सहन कराव्या लागणार का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
समस्यांचा वाचला पाढा
दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण झालेली नाहीत. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा व अडथळे अद्यापही मोठ्या प्रमाणात कायम असून, यामुळे पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळा सुरू झाल्यावरच कामे करण्याची पालिकेची सवय झाली आहे का? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हा आणखी एक गंभीर मुद्दा त्यांनी मांडला. अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्यांची िबकट िस्थती झाली असून, अपूर्ण कामांमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. पावसाळ्यापूर्वीच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही ती प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रस्त्यांवर पाणी साचण्याच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास अपघात आणि वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
डंम्िपंग ग्राउंड समस्येवर कायमस्वरुपी उपाययाेजना करा
मुलुंड, कांजुरमार्ग व देवनार डंम्िपंग ग्राऊंड परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. विशेषतः देवनार डंपिंगमुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी े केली. स्थानिक नागरिक वर्षानुवर्षे त्रास सहन करत आहेत, मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या सर्व मुद्द्यांची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात कामे कितपत गतीने पूर्ण होतील याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. पुढील आठवड्यात त्या स्वतः संबंधित भागाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती कामे पूर्ण करण्यात पालिका अपयशी ठरत असल्याचे सातत्याने समाेर येत अाहे. याबाबत जर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी तुंबणे, वाहतूक कोंडी व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार, असल्याचे दिसून येत आहे.






