
धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा जलवा! (photo Credit - X)
महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी मिळून तब्बल ४० जागांवर विजय मिळवला असून जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे आगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच महत्त्वाच्या समित्यांच्या निवडीत महायुतीचे पारडे जड राहणार असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, विरोधकांना मात्र अपेक्षेपेक्षा मर्यादित यश मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना ७ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला. समाजवादी पक्षाला १ जागा मिळाली असून इतर व अपक्ष उमेदवारांनी ४ जागांवर बाजी मारत काही ठिकाणी मोठ्या पक्षांना धक्का दिला आहे.
या निवडणुकीत स्थानिक मुद्दे, विकासकामे, तसेच महायुतीची एकत्रित रणनीती निर्णायक ठरल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. विशेषतः ग्रामीण भागात भाजप आणि शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
आता जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसह अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि विषय समित्यांचे अध्यक्ष कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर