वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सातारा नगरपालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने पाहणी केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
पालिकेचे नियोजन सभापती अशोक शेडगे, वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, अभियंता विनोद दहिफळे यांनी मुख्याधिकारी विनोद झळक यांच्या निर्देशानुसार ही पाहणी केली. सुमारे दीड तास चाललेल्या या पाहणीत बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा 15 मीटरपर्यंत मोजणी केली.
हे देखील वाचा : “सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करा…; हाय कोर्टाने फटकारले
या वेळी अनेक ठिकाणी घरांचे व गटारांवरील अतिक्रमण आढळून आले. बोगद्यापासून समर्थ मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचा तीव्र उतार, तसेच वाहतुकीची सुरक्षितता आणि सुलभता लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत आहे. यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांना लवकरच नोटिसा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर समर्थ मंदिर परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देत अतिक्रमणांवर कारवाई करताना केवळ एका भागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरात समान व कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.
पाचगणी राज्य मार्गावरील करहर पूल वाहतुकीस खुला
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जावळी तालुक्यातील पाचवड- पाचगणी राज्य मार्गावरील करहर नजीक असलेला पुलासाठी जवळपास ९९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार या पुलाचे काम बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. व हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पुलाची उंची व रुंदी वाढल्याने वाहतूक सुरळीत होण्यास आता मदत होणार आहे.
पाचवड-पाचगणी राज्य मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढलेली पाहायला मिळते. पाचगणी,महाबळेश्वर पर्यटन स्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावरून दिवसेंदिवस वाहतूक वाढत चालली आहे.करहर नजीक मोठ्या ओढ्यावर असलेला पूल हा अरुंद व उंचीने कमी असल्याने पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात होता. त्यामुळे या पुलाची उंची वाढवली जावी अशी मागणी या विभागातील लोकप्रतिनिधी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या पुलासाठी निधी मंजूर केला होता.






