कणकवली शहराला स्मार्ट सिटी म्हणून ओळख देणार, नितेश राणेंचं आश्वासन
कणकवली ( भगवान लोके ) : कणकवली शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा शब्द खासदार नारायण राणे यांनी दिला होता. कणकवलीकरांना जे जे शब्द दिले होते, त्या सर्व गोष्टी आणि प्रकल्प शब्दांपलीकडे जाऊन कृतीतून आम्ही पूर्ण करून दाखवले आहेत. बारा महिने वाहणाऱ्या धबधब्याचे लोकार्पण आज झालेलं आहे. शहरात पर्यटन वाढवण्यासाठी व शहरातील लोकांना आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा चांगला प्रकल्प आहे. या सगळ्यामुळे कणकवली शहराला स्मार्ट कणकवली म्हणून ओळख मिळेल याचा आनंद वाटत आहे, असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे.
बारमाही वाहणाऱ्या धबधब्याचे लोकार्पण आज कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक किशोर राणे , शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय कामतेकर, विराज भोसले, मेघा सावंत, अनिल पवार, महेश सावंत, बंडू गांगण, शिशिर परुळेकर, महेश सावंत, विशाल कामत, गौतम खुडकर, संजना सदडेकर, चारू साटम, प्रतीक्षा सावंत, प्रशांत सावंत, ठेकेदार अनिस नाईक, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अमोल आघम, प्रशांत राणे, रविंद्र म्हाडेश्वर, निवृत्त कर्मचारी किशोर धुमाळे आदी सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा- अजित पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते जाणार शरद पवार गटात
यावेळी नितेश राणे म्हणाले की , आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कणकवलीचं नेतृत्व केलं त्यांनी कणकवलीसाठी काय केलं ? आम्ही गेल्या पाच वर्षात स्पोर्ट कॉम्प्लेक्स, पोदार इंटरनॅशनल स्कुल, बारा महिने वाहणारा धबधबा, रस्त्यांचे जाळं,कणकवली-जाणवली गावाला जोडणारा ब्रीज असे अनेक विषय पूर्ण केले. कणकवली शहरात पाय ठेवल्यावर स्मार्ट कणकवली पहायला मिळते. याच सर्व श्रेय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व सहकारी यांचं आहे.
हेही वाचा- सरकारने धडाकेबाज कारवाईची घेतली दखल; अमोल झेंडे अन् टीमला 25 लाखांचं बक्षीस
या सगळ्या उपक्रमासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे देखील मोठे सहकार्य मिळाले. महायुतीचे सरकार आल्यानंतर कणकवली शहराला भरघोस निधीच्या माध्यमातून जे झुकतं माप दिलं. त्यामुळे हे सर्व प्रकल्प होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे मी आभार मानतो. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.