अमरावती जिल्ह्यातील दत्तगिरी महाराज यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दत्तगिरी महाराज यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यापुढे सर्व समान असल्याचे सांगितले. आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. यशोमती ठाकूर यांनी कोणत्याही व्यक्तीला राजकीय पाठबळ किंवा प्रभावाच्या आधारे संरक्षण मिळता कामा नये, असेही म्हटले. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ नये आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्ह्यातील दत्तगिरी महाराज यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दत्तगिरी महाराज यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यापुढे सर्व समान असल्याचे सांगितले. आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. यशोमती ठाकूर यांनी कोणत्याही व्यक्तीला राजकीय पाठबळ किंवा प्रभावाच्या आधारे संरक्षण मिळता कामा नये, असेही म्हटले. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होऊ नये आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.






