• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • We Will Fulfill The Common Mans Dream Of Housing And Bring Back Marathi People Who Have Left Mumbai

Eknath Shinde : सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार, मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. नेमकं काय म्हणाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2025 | 06:56 PM
मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार (फोटो सौजन्य-X)

मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. मुंबईसाठी सर्वाधिक काम महायुती सरकारच्या काळात झालंय. ही कामं मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास आम्ही करतोय. मुंबईचा सर्वार्थाने कायापालट केला जात आहे.

मध्य रेल्वेवर गणपती विशेष गाड्यांची घोषणा, मात्र तासाभरातच प्रवाशांना मोठा धक्का…

वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम आम्ही करीत आहोत. यामध्ये मोतीलाल नगर गोरेगाव, जीटीपी नगर येथे समूह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ४९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा अभ्युदयनगर इथल्या समुह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर २०२५पर्यंत ती पूर्ण होईल. ११ हजार ४११ भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे. आदर्शनगर वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ २०१० रहिवाशांना होणार आहे त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. वरळी नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये एकूण १५ हजार ६०० भाडेकरूंचे पुनर्वसन होणार आहे. त्यापैकी वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करणार आहोत. एकूण सदनिकांपैकी २५ टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचे नियोजन केले आहे.रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करतोय. या भागातून जाणाऱ्या पूर्वमुक्त मार्गाचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येतंय. पहिल्या टप्प्यात ६१४४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होत असून एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गिरणी कामगारांच्या घरांसाठी हौसिंग स्टॉक वाढवणार

गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासासाठी मोठा त्याग केला आहे. आम्ही गिरणी कामगारांना मुंबईलगत घरे बांधून देणार आहोत. मुंबईबाहेर गेलेल्या गिरणी कामगारांना मुंबईत आणतोय. गिरणी कामगारांचे सर्वेक्षण करण्यासाठी अॅप तयार केले. मुंबईतल्या आजारी, बंद पडलेल्या गिरण्यांमधल्या १ लाख ७४ हजार १७२ गिरणी कामगारांची नोंद झाली.यापैकी २८ गिरण्यांच्या जागांवर बांधकाम पूर्ण करून घरांच्या सोडती चार टप्प्यात म्हाडाकडून काढण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत १३ हजार १६१ गिरणी कामगारांना घरं दिली आहेत.एमएमआरमध्ये अंदाजे एक लाख इतकी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी निर्णय घेतला आहे.एकूण सात जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचं ठरवले आहे. गिरणी कामगारांना परवडणारी घरे योजनेतून घरे उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी हौसिंग स्टॉकही वाढवला जाईल. त्यासाठी नियमात बदलही केले जातील,अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

धारावीचा पुनर्विकास ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धारावीचा पुनर्विकास हे आमचे वचन आहे. या पुनर्विकासामुळे मुंबईचे नाही तर, देशाचं नाव जगात मोठं होईल. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी नाही तर जगातला सर्वात मोठा पुनर्विकासाचा गृहनिर्माण प्रकल्प अशी ओळख होणार आहे. या प्रकल्पामुळे धारावीकरांचं जीवनच बदलून जाणार आहे.आम्ही धारावीतल्या प्रत्येकाचं पुनर्वसन करणार आहोत. एकूण ७२ हजार कुटुंबांचं पुनर्वसन होणार आहे. हा पुनर्विकास फक्त पायाभूत सुविधांचा नाही, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक सलोख्याचं मॉडेल ठरेल. हे ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेनं उचललेलं ऐतिहासिक पाऊल आहे.

परवडणारी ३५ लाख घरे बांधणार

परवडणाऱ्या घरांसाठी नवीन गृहनिर्माण धोरण तयार केले असून ७० हजार कोटींची गुंतवणूक करून ३५ लाख घरे बांधणार आहोत. सर्वसामान्यांना हक्काची परवडणारी, पर्यावरणपूरक घरे मिळणार आहेत. मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही खूप मोठा आहे. मुख्यमंत्री असताना बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये (अधिनियम 1976) सुधारणा केल्या आणि त्यामुळे आता अर्धवट सोडलेले प्रकल्प झपाट्याने पूर्ण करता येणार आहेत. रखडलेल्या ‘एसआरए’च्या योजना सरकारी संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होऊन ४० लाख झोपडपट्टीवासियांना घरे देण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने झोन निहाय समर्पित एजन्सी नेमून खड्डे तक्रारीवर कार्यवाही केली जात आहे. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी जेवढा खर्च लागतो तो यावर्षी ५० टक्क्यांनी कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल त्याचबरोबर तपासणीसाठी मुंबई आयआयटी सोबत करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपला दवाखान्यासाठी ११०६ कोटी रुपये

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी पुढील चार वर्षांसाठी ११०६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राथमिक आणि अद्ययावत चाचण्या या दवाखान्यामध्ये केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसह राज्याच्या विकासाच्या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Web Title: We will fulfill the common mans dream of housing and bring back marathi people who have left mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी
1

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी

Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?
2

Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?

‘पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला, पण…’; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
3

‘पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला, पण…’; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान

Mumbai Crime: मामा-मामीनेच चिमुकलीला विकलं; दुप्पट रकमेवर पुढे विक्री,  48 तासांत पोलिसांनी केली सुटका
4

Mumbai Crime: मामा-मामीनेच चिमुकलीला विकलं; दुप्पट रकमेवर पुढे विक्री, 48 तासांत पोलिसांनी केली सुटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Black Friday Sale: iPhone 16 मिळणार कमालीचा स्वस्त, 40,000 रूपयांपेक्षाही कमी भावात, ग्राहकांची चंगळ

Black Friday Sale: iPhone 16 मिळणार कमालीचा स्वस्त, 40,000 रूपयांपेक्षाही कमी भावात, ग्राहकांची चंगळ

Nov 26, 2025 | 05:45 PM
Navi AMC कडून देशातील पहिला ‘निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० इंडेक्स फंड’ लाँच; गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण संधी

Navi AMC कडून देशातील पहिला ‘निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० इंडेक्स फंड’ लाँच; गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण संधी

Nov 26, 2025 | 05:43 PM
३ बायकांसोबत कपिलचा नवा संघर्ष! ”Kis Kisko Pyar Karoon 2′ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, नेटकरी झाले हैराण

३ बायकांसोबत कपिलचा नवा संघर्ष! ”Kis Kisko Pyar Karoon 2′ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, नेटकरी झाले हैराण

Nov 26, 2025 | 05:42 PM
Solapur News: शरद पवारांना रामराम; बळीरामकाका साठे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Solapur News: शरद पवारांना रामराम; बळीरामकाका साठे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Nov 26, 2025 | 05:39 PM
क्रीडा जगतात शोककळा! बास्केटबॉलचा खांब ठरला काळ; मैदानावरच राष्ट्रीय खेळाडूने सोडला जीव; Video Viral

क्रीडा जगतात शोककळा! बास्केटबॉलचा खांब ठरला काळ; मैदानावरच राष्ट्रीय खेळाडूने सोडला जीव; Video Viral

Nov 26, 2025 | 05:35 PM
“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा

Nov 26, 2025 | 05:30 PM
Ahilyanagar News: भाजपच्या हातात सत्ता द्या, कोपरगाव पाणी प्रश्न सोडवू! मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

Ahilyanagar News: भाजपच्या हातात सत्ता द्या, कोपरगाव पाणी प्रश्न सोडवू! मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

Nov 26, 2025 | 05:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.