'स्वच्छ वरळी, सुंदर वरळी' अभियान (फोटो- सोशल मिडिया)
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी रहिवाशांनी परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या गंभीर समस्या खासदार शिंदेंच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिवसेनेच्या पथकाने परिसराची पाहणी करून ‘स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ अभियानांतर्गत ही मोहीम हाती घेतली.
वर्षभरासाठी विशेष आराखडा अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले असून स्थानिक आमदारांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप सचिन अहिर यांनी केला. ते म्हणाले, “आज केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून थांबणार नाही, तर वरळी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वर्षभराचा विशेष आराखडा तयार करून ही मोहीम सातत्याने राबवली जाईल.”
Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?
विरोधकांनी आरोपांपेक्षा मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करावे मतदार याद्यांमधून सुमारे दोन कोटी नावे वगळल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर उपसभापती अहिर यांनी कडाडून टीका केली. “एसआयआर प्रक्रिया सुरू असताना विरोधकांचे बीएलओ काय करत होते? केवळ बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे आणि ज्या नागरिकांची नावे वगळली गेली आहेत, ती पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत,” असा सल्लाही विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर दिला.






