• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Onion Export Ban By Central Government Resentment In The Farming Class Nrdm

कांद्यावरून पुन्हा वांदा! केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी; शेतकरी वर्गात नाराजी ?

गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अगोदरच निराश आहे. त्यातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2023 | 11:09 AM
कांद्यावरून पुन्हा वांदा! केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी; शेतकरी वर्गात नाराजी ?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रांजणी : गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अगोदरच निराश आहे. त्यातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याचे समोर आले आहे. स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. 31 मार्च 2024 सालापर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून नुकतेच काढण्यात आले आहे.

दरम्यान कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून. ठीक ठिकाणी आंदोलने देखील आता सुरू करण्यात आली आहेत. केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय हा योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा अद्यापही बराखीमध्ये साठवून ठेवला आहे. हा कांदा बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला खरा मात्र निर्यात बंदीमुळे कांद्याला चांगला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अगोदरच निराश असल्याचे चित्र दिसून येते. त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर पुणे लासलगाव मनमाड नांदगाव शहर बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत.

जिल्ह्यात स्थानिक बाजारात स्थानिक विक्रेते 70 ते 80 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करत आहेत. मात्र आता निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर मध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात पंचवीस रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने कांदा देण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे अवकाळी आणि गारपिटीने बळीराजा होरपळला आहे. शेतकऱ्याला हिवाळी अधिवेशनादरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने पुन्हा नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने देखील सुरू केले आहेत.

निर्यात बंदीची सूचना किमान आठ दिवस अगोदर देणे गरजेचे होते परंतु केंद्र शासनाने घेतलेला निर्णय शेतकरी आणि व्यापारी यांच्या मुळावर असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही तोपर्यंत आर्थिक व्यवहार सुरळीत होत नाही. एकूणच भारताचा कांदा हा विविध देशांमध्ये निर्यात केला जातो. भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी देखील आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीत हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. परंतु अचानक सरकारने कांदा निर्यात बंदीचे हत्यार उपसले आहे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे

Web Title: Onion export ban by central government resentment in the farming class nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2023 | 11:09 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • navarshtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास

‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास

Nov 19, 2025 | 11:43 AM
Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

Nov 19, 2025 | 11:43 AM
आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

Nov 19, 2025 | 11:41 AM
Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!

Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!

Nov 19, 2025 | 11:35 AM
उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश

उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश

Nov 19, 2025 | 11:30 AM
‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढते तीव्र उष्णता, पोटदुखी वाढून आम्लपित्तमुळे पोहचेल शरीराला हानी

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढते तीव्र उष्णता, पोटदुखी वाढून आम्लपित्तमुळे पोहचेल शरीराला हानी

Nov 19, 2025 | 11:28 AM
World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून

World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून

Nov 19, 2025 | 11:21 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.