Britain Colonial Loot: 'वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..' आता ब्रिटनची 'या' देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Suella Braverman India Reparations : १८व्या आणि १९व्या शतकात ब्रिटनने (britain) भारतासह जगभरातील सुमारे ५० हून अधिक देशांवर वसाहतवादी राजवट प्रस्थापित केली होती. या काळात ब्रिटनने या देशांमधील नैसर्गिक आणि मानवी साधनसंपत्तीची अथांग लूट करून आपली तिजोरी भरली. परंतु, आता ब्रिटनच्या माजी गृहमंत्री आणि भारतीय वंशाच्या नेत्या सुएला ब्रेव्हरमन यांनी या माजी वसाहतवादी देशांनीच ब्रिटनला नुकसानभरपाई द्यावी, असा धक्कादायक युक्तिवाद केल्यामुळे एक नवा वाद पेटला आहे. ब्रिटिश साम्राज्याने या देशांच्या विकास प्रकल्पांवर आणि रेल्वेवर खर्च केलेले पैसे त्यांनी ब्रिटनला परत करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या वादाची तात्कालिक सुरुवात कॅरिबियन देश जमैकामुळे झाली आहे. जमैकाने वसाहतवादी काळातील गुलामगिरी आणि अमानुष शोषणाविरोधात ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्याकडे अधिकृतपणे नुकसानभरपाई मागण्याचे जाहीर केले आहे. यासाठी ६ सप्टेंबर रोजी जमैकाचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ इंग्लंडला भेट देणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Solar Eclipse 2026: दिवसा होईल संपूर्ण अंधार, रात्री चमकेल आकाश; जाणून घ्या कधी घडणार ‘ही’ दुर्मिळ खगोलीय घटना?
याला तीव्र विरोध करताना सुएला ब्रेव्हरमन म्हणाल्या की, शतकांपूर्वी घडलेल्या घटनांसाठी आजच्या सामान्य ब्रिटिश नागरिकांना आर्थिकदृष्ट्या वेठीस धरू नये. उलट ब्रिटननेच भारत आणि जमैकासारख्या देशांमध्ये रेल्वेचे जाळे पसरवले आणि त्यांचा विकास केला, त्यामुळे या देशांनीच ब्रिटनला पैसे दिले पाहिजेत.
British politician of Indian origin @SuellaBraverman says former British colonies like India should pay Britain reparations for being plundered rather than Britain pay for plundering. She & @reformparty_uk boss @Nigel_Farage should listen to this masterclass by @ShashiTharoor👇 https://t.co/y1BawUVnaz — Minhaz Merchant (@MinhazMerchant) July 7, 2026
credit – social media and Twitter
ब्रेव्हरमन यांच्या या दाव्यानंतर जगभरातील इतिहासकार आणि अर्थतज्ज्ञांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ब्रिटनने भारतावर जवळपास दोनशे वर्षे राज्य करून भारताची अंदाजे ४५ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ४५ लाख कोटी डॉलर्स) संपत्ती लुटली. ही रक्कम ब्रिटनच्या सध्याच्या एकूण जीडीपीच्या (GDP) ११ पट अधिक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Solar Eclipse 2026: दिवसा होईल संपूर्ण अंधार, रात्री चमकेल आकाश; जाणून घ्या कधी घडणार ‘ही’ दुर्मिळ खगोलीय घटना?
इतिहासकारांच्या मते, ब्रिटनने भारतात किंवा जमैकामध्ये उभारलेली रेल्वे यंत्रणा स्थानिक लोकांच्या कल्याणासाठी नव्हती, तर येथील कच्चा माल बंदरांपर्यंत सहज पोहोचवून स्वतःचा व्यापार वाढवण्यासाठी होती. तसेच, भारतातील लोकशाही ही ब्रिटनची देणगी नसून, लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि भारतीय संविधान निर्मात्यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झाली आहे. १८३३ मध्ये ब्रिटनने गुलामगिरी नष्ट केली खरी, परंतु त्याचा आर्थिक मोबदला पीडित गुलामांना मिळण्याऐवजी, गुलाम गमावलेल्या श्वेतवर्णीय इंग्रज मालकांना देण्यात आला होता. हाच ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी जमैका आता आक्रमक झाला आहे.






