Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज
माथेरान शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम मंजूर आहे. मात्र धरणातील माती मिश्रित गाळ धरणातून बाहेर काढण्यासाठी मनुष्यबळ वापरून काढण्यात येत आहे. १० ऑगस्ट रोजी धरणातील पाणी सोडून देण्यात आले, मात्र गाळ तसाच राहिल्याने १० ऑगस्टपासून धरणाचे दरवाजा असलेली विहीर बंद केलेली नाही. परंतु धरणातील गाळ वाहून गेला नसल्याने गाळ मिश्रित पाणी धरणातून वाहून जात आहे. याचा सर्वाधिक धोका नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणाला निर्माण झाला. धरणातील माती मिश्रित गाळ काढण्यासाठी मनुष्यबळ लावले आहे.
धरणातील गाळ रस्त्यासाठी वापरला जाणार होता आणि तो गाळ पाण्यात सोडल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, या गाळाचा वापर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केला जाऊ शकतो. मात्र, प्रत्यक्षात ही माती पुन्हा पाण्याच्या प्रवाहात सोडली जात असल्याने उपयोग होत नाही.
पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराने तब्बल १०० मजूरांच्या सहाय्याने गाळ पाण्यात सोडण्याचा धडका उचलला आहे. धरणातील गाळवर पंपाद्वारे पाणी मारून ती माती पाण्यात वाहून जाईल अशा प्रकारे हे मजूर फावडा घेऊन गाळ पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नावर माथेरान नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि पर्यावरण संवेदनशील नागरिक प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पालिकेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे,
KDMC News: वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा
या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष वेधले असून, नगरपरिषद आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गाळ व्यवस्थापनाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष, माथेरान






