क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे (फोटो- ट्विटर)
मुंबई: नागपूर, मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात वसतीगृह, अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे “नागपूर स्पोर्ट्स हब” उभारण्यात येत आहे. हे स्पोर्ट्स हब पूर्णत्वाला नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केले. त्याचबरोबर “नागपूर स्पोर्ट्स हब” ची उभारणी विहित वेळेत करावी, कामचा दर्जा, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
आज मंत्रालयात “नागपूर स्पोर्ट्स हब”उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, उपअभियंता प्रशांत शंकरपुरे, वास्तूविशारद नुपूर वैद्य, नम्रता शेट्टी उपस्थित होते. मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, नागपूर, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटर, क्रीडा विद्यापीठाशी संलग्नीत कोर्सेससाठी अॅकेडमी सुरु करुन त्यात स्पोर्ट्स मीट, स्पोर्ट्स फिजीयोथेरेपी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स इव्हेंट, स्पोर्ट्स कोचींग इत्यादी कोर्सेस सुरु करुन खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करीयरची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आज मंत्रालयात “नागपूर स्पोर्ट्स हब"उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. नागपूर, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटर, क्रीडा विद्यापीठाशी संलग्नीत कोर्सेससाठी अॅकेडमी सुरु करुन त्यात स्पोर्ट्स मीट, स्पोर्ट्स… pic.twitter.com/vIk7UCH2LS
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) February 24, 2025
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी विशेष इनोव्हेटिव्ह स्पोर्ट्स स्कूलची उभारणी करण्यात येत आहे. स्पोर्ट्स इन्फॉरमेशन सेंटर उभारुन नवोदित खेळाडूंना व पालकांना विविध खेळाची अद्ययावत माहिती, शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजना, विविध पुरस्कार, शासकीय व खाजगी क्षेत्रातील सेवेच्या संधी इत्यादीबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण’ झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.