
कल्याण-डोंबिवलीतील या रखडलेल्या विकासकामांविरोधात काँग्रेस आणि स्थानिक संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.
यामुळे या प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. उड्डाणपुलाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदत उलटूनही काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात काँग्रेस पदाधिकारी जपजितसिंग मट्टा यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संताप व्यक्त करत या अपूर्ण पुलाला अभिनव गोयल अपूर्ण पूल असे नाव देण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या रखडलेल्या कामामुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, केडीएमसी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी कॉग्रेस पक्षाकडून होत आहे.
७ वर्षांचा विलंब: ठाकुर्ली येथील एलिव्हेटेड उड्डाणपुलाचे काम (ठाकुर्ली रेल्वे फाटक ते मासोबा चौक) गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून ते पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते.
नवीन निविदा: सात वर्षांच्या दिरंगाईनंतर, एमएमआरडीएने (MMRDA) हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी ३६ कोटी रुपयांची नवीन निविदा काढली आहे. माच्या संथ गतीमुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी असून, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी यापूर्वीही कामाच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तसेच पलावा उड्डाणपूल (काटई-निलजे): हा पूल सप्टेंबर २०२५ पर्यंत तयार झाला होता, परंतु त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सॅटिस प्रकल्पाचे कामही संथ गतीने सुरू आहे, ज्याला २०२६ पर्यंत गती देण्याचे निर्देश आहेत. कल्याण-डोंबिवलीतील या रखडलेल्या विकासकामांविरोधात काँग्रेस आणि स्थानिक संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.