सकाळची वेळ ही दिवसातील सर्वात महत्वाची वेळ असते. आपण आपला दिवस कसा सुरू करतो याचा संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, आपण नेहमीच निरोगी दिनचर्येने आपली सकाळ सुरू केली पाहिजे. यासाठी अगदी आयुर्वेदात पुरातन काळापासून सांगण्यात आले आहे. कोणत्या चार सवयी आहेत ज्या आपल्याला त्रासदायक ठरू शकतात याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी सांगितले आहे, जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
सकाळी उठल्यानंतर तुम्ही कळत नकळत अशा गोष्टी करता की त्याचा तुमच्या आरोग्यावर खूपच वाईट परिणाम होतो आणि या गोष्टी कोणत्या आहेत माहीत आहे का?
जवळजवळ प्रत्येकजण उठल्याउठल्या आपल्या आवडत्या व्यक्तीचं तोंड बघायचं सोडून आपला दिवस सध्या सर्वात पहिले फोन तपासून सुरू करतो, पण तुम्हाला माहिती आहे का की ही एक खूप वाईट सवय आहे?
खरं तर, जेव्हा तुम्ही सकाळी उठून तुमचा फोन पाहता तेव्हा त्यामुळे ताण आणि चिंता वाढू शकते. हे जास्त वेळ केल्याने अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो
रात्री ७ ते ८ तास झोपल्यानंतर सकाळी आपले शरीर डिहायड्रेट होते, ज्यामुळे डोकेदुखी, थकवा, कामात एकाग्रतेचा अभाव यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, सकाळी उठल्यानंतर किमान २ ते ३ ग्लास पाणी प्या. यामुळे चयापचय गतिमान होते आणि शरीर डिटॉक्स होते
नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. नाश्ता वगळल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. जर तुम्हाला निरोगी जीवन टिकवायचे असेल, तर सकाळी लवकर पौष्टिक नाश्ता करण्याची सवय लावा
सकाळी उठल्यानंतर कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करावी, असे न केल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. म्हणून, सकाळी उठल्यानंतर किमान ३० मिनिटे व्यायाम करा