भारतातील प्रत्येक गावात एक खास प्रथा आणि पंरपरा आहे. प्रत्येक गाव त्याच्या वेगळ्या परंपरेसाठी प्रसिध्द आहे. आता अशाच एका गावातील परंपरेविषयी आम्ही तुम्हाला सागंणार आहोत. या गावात घराबाहेर पडताना लोकांना बूट किंवा चप्पल घालण्यास मनाई आहे. तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात हे गाव वसलं आहे. या परंपरेमागील कारण काय आहे, गावात ही परंपरा का पाळली जात आहे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - pinterest)
भारतातील या ठिकाणी लोकांना बूट घालण्यास बंदी; काय आहे कारण, जाणून घ्या

आज शूज किंवा चप्पल घालणं ही प्रत्येक व्यक्तिची गरज बनली आहे. मात्र एक असं गाव आहे, ज्या ठिकाणी घराबाहेर पडताना शूज किंवा चप्पल घालण्यास बंदी आहे.

तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात अंदमान नावाचं गाव वसलं आहे. या गावात ही अनोखी परंपरा जोपासली जाते. या गावात लोक घराबाहेर पडताना बूट आणि चप्पल घालणे पाप मानतात.

या गावातील लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या गावाचे रक्षण मुथ्यालम्मा नावाच्या देवीने केले आहे. त्यामुळे देवीच्या पूजेसाठी ते बूट आणि चप्पल घालत नाहीत.

या गावातील लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचे संपूर्ण गाव मंदिरासारखे आहे. त्यामुळे ते संपूर्ण गावात बूट आणि चप्पल घालत नाहीत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असून गावातील लोक तिचे पालन करतात.

गावातील प्रत्येकजण हा नियम पाळतो. खेडेगावात, वृद्ध किंवा आजारी लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन चप्पल किंवा बूट घालतात. सूर्यप्रकाशामुळे जमीन गरम होते तेव्हाही मोजकेच लोक चप्पल घालतात.

हा नियम फक्त गावातील लोकांना लागू आहे. या नियमाबाबत बाहेरील लोकांवर कोणताही दबाव आणला जात नाही.






