राज्यात उद्या 19 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. तर परवा निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान मुंबईची निवडणूक यंदा सर्वात महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. भाजप शिवसेना युती विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत होणार आहे. यामध्ये मराठी भाषा, मुंबईचा विकास, अमराठी-मराठी, अंबानी, अडाणी, मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डाव असे अनेक मुद्दे प्रचारात पाहण्यास मिळाले. तसेच भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जास्तीत जास्त विकासावरच भाष्य केल्याचे दिसून आले. दरम्यान 16 तारखेला मुंबईकर जनता कोणाच्या परड्यात यश देणार हे पहावे लागणार आहे.
BMC Election 2026 Photos: 'अदाणी, मराठी अन्...; 'देवाभाऊ' की ठाकरे बंधू? मुंबईकर कोणाला निवडणार...

यंदाची मुंबईची निवडणूक भाजप, शिवसेना विरुद्ध ठाकरे बंधू अशी असणार आहे.

प्रचारादरम्यान ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या.

मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे बंधूंसाठी भवितव्य ठरवणारी असल्याची चर्चा सुरू आहे.

राज ठाकरे यांनी अदाणी, अंबानी आणि परप्रांतीयांतचा मुद्दा उचलून धरला.

उद्धव ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा यंदाच्या प्रचारात उचलून धरल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटल सेतु, कोस्टल रोड आणि मुंबईच्या विकासावरच भाष्य केल्याचे पाहायला मिळाले.






