फोटो सौैजन्य: X.com
सारी बाबांच्या शिर्डीत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असतानाही गुन्ह्यांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. शनिवारी रात्री निवासी भागातील पूनमनगर येथे मुस्लिम धर्मगुरू दानिश नफीज चौधरी यांच्यावर अज्ञात तिघांनी प्राणघातक हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना चौधरी हे संध्याकाळी नमाजपठणासाठी जात असताना श्रीरामनगर पोलिस चौकीच्या मागील भागात तिघांनी त्यांना अडवले. नाव विचारल्यानंतर अचानक चाकूने वार करण्यात आला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या डोक्यावर व पायावर दगड मारत दुचाकीवरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच नमाजासाठी आलेल्या शेकडो मुस्लिम बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मौलाना चौधरी यांना तातडीने रुग्णवाहिकेतून Saibaba Super Speciality Hospital येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत.
Amravati News: बँकेतून १३ लाखांचे सोने गायब!, निर्मल उज्ज्वल सोसायटीत मोठी खळबळ
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक रणजित गलांडे व सहायक पोलिस निरीक्षक निवांत जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारी Somnath Gharage (पोलिस अधीक्षक) आणि Somnath Wakchaure (अप्पर पोलिस अधीक्षक) यांनीही घटनेची गंभीर दखल घेत आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.
दरम्यान, घटनास्थळाजवळील पोलिस चौकी बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. तसेच नगरपरिषदेने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. यापूर्वीही याच परिसरात भाविकांच्या लुटीच्या घटना घडल्या होत्या. ताज्या हल्ल्यामुळे पूनमनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने हा परिसर काही अंशी असामाजिक तत्वांचा अड्डा बनल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे.
या घटनेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आल्याने नगरपरिषद प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. तसेच रस्त्यावरील बंद दिव्यांबाबतही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






