सुर्याचे अस्तित्व हे पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यावर पृथ्वीवर अनेक सजीव-निर्जीव गोष्टींचे जीवन अवलंबून आहे. सुर्योदय आणि सूर्यास्तामुळे अनेक नैसर्गिक क्रिया आणि पर्यावरणीय प्रक्रिया प्रभावित होतात. जगभरात विविध देशांमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताचे वेळ वेगवेगळे असतात, ज्यामुळे त्या ठिकाणांच्या जीवनशैलीवर आणि जैवविविधतेवर प्रभाव पडतो. पण तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात पहिला किंवा सर्वात आधी सुर्योदय कुठे होतो? बहुतेक जणांना याचे उत्तर माहित नसेल. तर आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर पहिल्या सुर्योदयाचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतातील या गावामध्ये होतो पहिला सुर्योदय
तर पहिला सुर्योदय हा भारतातील अरूणाचल प्रदेशामध्ये होतो. अरूणाचल प्रदेशातील अजाऊ जिल्ह्यातील डोंग व्हॅली या गावात प्रथम सुर्य उगवतो
हे शहर भारताचे जपान म्हणून ओळखले जाते. हे शहर चीन आणि म्यानमारच्या त्रि-जंक्शनवर वसलेले आहे. इथे सूर्याची किरणे सर्वात पहिल्यांदा पृथ्वीला स्पर्श करतात
हे छोटेसे गाव ईशान्य भारतात स्थित असून, येथे दरवर्षी देशविदेशातून पर्यटक भेटीला येतात
डांगगमध्ये, पहाटे ४ वाजता सूर्याच्या किरणांनी गडद आकाशात झळकायला सुरुवात होते. यावेळी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये रात्रीचे ३ वाजलेले असतात. इथे सूर्याची पहिली लालिमा पहाटेच्या आकाशात दिसायला लागते
डोंग व्हॅली हे सुमारे 1240 मीटर उंचीवर वसलेले आहे. इथे दिवसाचा प्रकाश साधारण 12 तासांचा असतो
जसे या ठिकाणी पहिला सुर्योदय होतो तसेच इथे भारताच्या इतर ठिकाणांच्या एक तास आधी सुर्यास्त देखील होतो