रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप! (Photo Credit- X)
“उद्धवजी तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, ते तुम्हाला फसवत आहेत. सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील त्या पत्रावर सही आहे आणि तो खासदार आज तुमच्या बाजूला बसला आहे. तो सातवा खासदार मंत्रिपदाची मागणी करत होता. मला आधी मंत्रिपदाचा शब्द द्या, असं तो सातवा खासदार म्हणत होता. त्या सातव्या खासदाराने देखील त्या पत्रावर सही केलेली आहे. मात्र, तोच तुमच्या बाजूला आता बसत आहे. उद्धवजी हे तुम्हाला फसवत आहेत, हे लोक तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली, याचा अभिमान आम्हाला वाटतो. उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही. फक्त आदित्यसाठी पक्षाची वाट लावली आहे. त्याला आम्ही साहेब म्हणायचं. माझ्या चेंबरला आदित्य यायचे तेव्हा मी उठायचो, खुर्ची द्यायचो. मात्र मला काय माहिती होतं ते माझंच मंत्रीपद घेतील? मातोश्री आमचं मंदिर होतं, खूप वाईट वाटलं. ही आजची वेळ का यावी? का सगळे बाहेर पडलेत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ठाकरे सेनेच्या फुटेलेल्या ६ खासदाराविरुद्ध अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे धक्कादायक उदाहरण पाहत आहोत. हे निर्लज्ज, कृतघ्न आणि भ्रष्ट लोक जे काही विशिष्ट व्यक्तींमुळे २०२४ मध्ये निवडून आले तेच आता त्या लोकांना धोका देत आहेत! असे त्यांनी म्हटले आहे.
पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल! असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.






