'चिल्लर' म्हणत नवनीत राणा यांनी केली विजय वडेट्टीवारांवर टीका; 'काँग्रेसने हिरवे विषारी साप...' (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : भाजप नेत्या नवनीत राणा आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यात टीकाटिप्पणी सुरु आहे. त्यातच विजय वडेट्टीवार यांच्यावर नवनीत राणा यांनी चिल्लर म्हणून टीका केली. हे सगळे चिल्लर लोक आहे. या चिल्लर लोकांवर मला बोलायची गरज नाही. काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहेत म्हणून ते वळवळ करतात, असे राणा यांनी म्हटले आहे.
नवनीत राणा यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसने हिरवे विषारी साप पोचून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम व हे सगळे जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं. ते आता बाहेर निघत आहेत. आता त्या हिरव्या सापांना ठेचण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. त्यांना सोडणार नाही. देशाने सर्व पाहिले आहे की ज्यावेळी सर्वांच्या सपोर्टची देशाला गरज होती तेव्हा तेव्हा त्यांनी कसा विरोध केला हे जगाने पाहिला आहे. त्यामुळे या चिल्लर माणसाने आम्हाला समजून सांगू नये, असे म्हटले आहे.
दरम्यान, या चिल्लर लोकांनी महिलांवर बोलण्याच्या आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये पाहा. ज्या हिरव्या विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचं काम करत आहे. तुमच्या घरी सुद्धा मुली आहे हे पाहून सुद्धा तुम्ही बोलण्याचं टाळा. या चिल्लर माणसांनी नाशिकच्या प्रकरणावर का प्रतिक्रिया दिली नाही? तेव्हा वळवळ का बाहेर निघाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
परतवाडा प्रकरण
अमरावतीच्या प्रकरणांमध्ये अजूनही खूप काही विषय बाकी आहेत. लॅपटॉप, मोबाईल, हार्डडिक्समधील आणखी डाटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे, त्यावर आमचे पालकमंत्री योग्य कारवाई करतील, असे राणा म्हणाल्या.
अमरावती व्हिडिओ प्रकरणावरही संताप
दुसरीकडे, अमरावती व्हिडिओ प्रकरणावर यापूर्वीच नवनीत राणा यांनी विधान केले होते. त्या म्हणाल्या, “नाशिक आणि महाराष्ट्रातील एका कॉर्पोरेट कार्यालयाशी संबंधित काही प्रकरणे नुकतीच समोर आली होती; त्यावर काही तास उलटलेच होते की, अमरावतीमधील अचलपूर-परतवाडा येथून व्हिडिओचे दृश्ये समोर आली. संबंधित आरोपीचे घर सध्या पाडले जात आहे आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. माझी एकमेव मागणी अशी आहे की, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ‘योगी बाबांचा आवेश’ संचारला पाहिजे. कोणतीही सुनावणी नाही, न्यायालयाच्या तारखा नाहीत त्या व्यक्तीचा तातडीने एन्काउंटरच केला गेला पाहिजे’, असेही यापूर्वी म्हटले होते.






