Devendra Fadnavis On Uddhav Thackeray (Photo Credit- X)
विदर्भ-मराठवाडा दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपरवा ते नागपूरच्या प्रवासात माझ्यासोबत विमानात बसले होते. पण ते प्रचंड हतबल दिसत होते. ते मुख्यमंत्री आहेत की नाही, हे कळतच नव्हते. त्यांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे, असे ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी नितीन गडकरींचा संदर्भ दिला. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण नंतर काय झाले? त्यांच्या इथेनॉलमध्ये पाणी टाकून त्यांचे पंख छाटण्यात आले. आता गडकरी कुठे आहेत? जो जो शर्यतीत येतो, त्याला हे लोक वेळेवर बाजूला करतात, असा गंभीर आरोप ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंच्या या विधानावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना खोचक टिप्पणी केली. फडणवीस म्हणाले, माझ्याकडे उडायला पंखच नाहीत, मी जमिनीवर चालणारा माणूस आहे. त्यामुळे माझे पंख कोण छाटणार? माझ्या पाठीशी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि पक्षाच्या वरिष्ठांचा खंबीर आशीर्वाद आहे. विमानातील प्रवासाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, आम्ही एकाच सर्व्हिस फ्लाईटमध्ये योगायोगाने प्रवास करत होतो. उद्धव ठाकरे एका बाजूला बसले होते आणि मी दुसऱ्या बाजूला होतो. जर आम्ही शेजारी-शेजारी बसलो असतो, तर नक्कीच गप्पा मारल्या असत्या. पण मी विमानात असताना मोबाईलवर आधीच डाऊनलोड केलेली एक वेबसिरीज पाहण्यात व्यस्त होतो. या सर्व्हिस फ्लाईटमधील प्रवासावर एवढी चर्चा होताना पाहून मला प्रश्न पडला की, आपण काय वेड्यांच्या बाजारात बसलोय का?
या विमानप्रवासाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेने त्यांना एकाच विमानातून प्रवास करण्याचं तिकीट दिलं होतं, पण त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. त्यामुळे आज ते गटांगळ्या खात आहेत. पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, देवेंद्रजी खूप हुशार आहेत. 2019 मध्ये कपटी मित्र किती घातक ठरू शकतो, हे त्यांनी पाहिलं आहे.”
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…






