'मातोश्री'वर आज ठाकरे गटाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक; 'या' गोष्टीवर होणार चर्चा?
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षातील लोकसभेच्या २० खासदारांनी भाजपप्रणित एनडीएला समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर ममता बॅनर्जीच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज (दि.१४) बैठक बोलावली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच अलर्ट झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’बाबत शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर आहे. अशी बैठक म्हणजे कोणत्याही पक्षात सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. अशा बैठका ‘मातोश्री’वर सातत्याने होत असतात. पुढच्या महिन्यात लोकसभेचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सगळ्या नऊ खासदारांना बोलावून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली साताऱ्यात उदयनराजे यांची भेट, आगामी राजकीय समीकरणांवर चर्चा
‘ऑपरेशन टायगर’ करणार असं जे म्हणतात त्यांचे ऑपरेशन अमित शाह यांनी शंभरवेळा केले आहे. माणसं फोडणं ही एक प्रकारची विकृती आहे. जेव्हापासून या देशात मोदी-शाहांचे राज्य आलंय तेव्हापासून या विकृतीने कळस गाठला आहे. महाराष्ट्रासारखं राज्यसुद्धा त्यांनी नासवलं आहे. योग्यवेळी राज्यात आणि देशात या विकृतीविरोधात जनता बंड करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
‘ऑपरेशन टायगर’ होणार का?
ठाकरेंचे खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची व काही दिवसांत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही महिन्यांत ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मागील काही महिन्यांत संजय दीना पाटील हे शिंदे यांच्यासोबत एकाच कारने प्रवास करताना आढळून आले होते. खासदार राजाभाऊ वाजे हे तर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एका मंचावर दिसले होते. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
‘अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद…’ राष्ट्रवादी शरद पवार गटाची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका






