Priyanka Gandhi, Mohan Bhagwat, RSS, Congress, National News,
Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जनरेशन झेडला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. जर त्यांना खरोखरच जनरेशन झेडची काळजी असेल, तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राजीनामा देण्यास सांगावे. नाहीतर, अमित शाहांनी किमान संसदेत येऊन विद्यार्थ्यांची माफी मागावी.” अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांवर निशाणा साधला आहे.
मोहन भागवत यांनी काल (6 ऑगस्ट) यांनी जेन-झीं सोबत संवाद साधला. या संवादानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा आरएसएस आणि भाजपला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. मोहन भावतांच्या जेन-झी संवादावर काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणाले, “सरकारवर आरएसएसचे नियंत्रण आहे. जर त्यांना खरोखरच विद्यार्थ्यांची काळजी असेल, तर त्यांनी त्यांच्यावरील अत्याचारांचा निषेध केला पाहिजे. विद्यार्थी पेपरफुटी प्रकरणी जबाबदारीची मागणी करत असताना त्यांच्यावर पेलेट गनचा वापर करण्यात आला, या मुद्द्यावर भागवत मौन का आहेत असा सवाल उपस्थित करत हा सगळा निव्वळ देखावा आहे.” अशी टिका वेणुगोपाल यांनी केली.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा यांच्याशी एक तास संवाद साधला. ते म्हणाले की, जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा या जुन्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आणि प्रामाणिक आहेत. आपण त्यांचे ऐकले पाहिजे. त्यांच्याशी संवादाचा अभाव होता, म्हणूनच दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन झाले.”
जेव्हा आम्ही जनरेशन-झेड होतो, तेव्हा आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकायचो आणि त्यावर प्रश्न विचारत नव्हतो. आजची जनरेशन-झेड प्रश्न विचारते. त्यांना उत्तरे आणि प्रेम हवे आहे. जनरेशन-झेडने आंदोलन करू नये, असे आम्ही म्हणणार नाही. संविधानात आंदोलनांना परवानगी असल्याचे म्हटले आहे, पण ते कसे करायचे हे आपल्याला पाहावे लागेल. असंही भागवत यांनी नमुद केलं.
आपल्याला हेही विचारात घ्यायला हवे की, जर जनरेशन-झेड जर काही मागण्या करत असेल, तर त्यांना काही समस्या आहेत म्हणून या मागण्या करत आहेत. आंदोलने आमच्या किंवा तुमच्या विरोधात नसावीत, तर ती व्यवस्थेतील सुधारणांसाठी असावीत. जर जनरेशन-झेड आंदोलन करत असेल, तर ते देशद्रोही नाहीत. ते आपलेच लोक आहेत, आपली पुढची पिढी आहे. आपले त्यांच्याशी नाते आहे. त्यांनी आपल्याला समजून घेतले पाहिजे आणि आपण त्यांना समजून घेतले पाहिजे.
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत बोलताना भागवत म्हणाले की, लाठीचार्ज का झालाआणि त्याचे कारण काय होते, हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. त्याचा आढावा घेतल्यानंतर समस्या नेमकी कुठे आहे, हे आपल्याला निश्चित करावे लागेल. मी वर्तमानपत्रात वाचले की यात काही दंगलखोर सामील होते. जर मला जनरेशन-झेडवर आंधळेपणाने विश्वास ठेवावा लागत असेल, तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकेन.






