
उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य (Photo Credit- X)
उबाठाचे सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केला. खासदार फुटल्यानंतर आता पक्षातील आमदारदेखील फुटणार असल्याच्या चर्चा राज्यात सुरु झाल्या आहेत. यावर मंत्री शिरसाट म्हणाले, आम्हाला टायगर ३ करायची आवश्यकता नाही. आमदार, नगरसेवक हे स्वतःच तिथे थांबायला आता तयार नाही. ते स्वतःच बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आम्हाला टायगर ३ करायचे नाही, पण ते यायला तयार असतील, आम्हाला साद गाळातील त्यांना आम्ही साथ देऊ असे शिरसाट पुढे म्हणाले.
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत, यावर शिरसाट म्हणाले, इतके खासदार पक्ष सोडून गेले याचे चिंतन, मनन करण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभावच नाही. त्याची त्यांना गरजही वाटत नाही. जिल्ह्याचा नेतृत्व करणारा माणूस जात असेल तर यामागे काहीतरी कारण असेल, हे जाणून घेणे गरजेचे असताना, केवळ कार्यकर्त्यांना दाखवण्यापुरता हा दौरा असल्याची टीका शिरसाट यांनी केली. पक्षात इतकी मोठी घडामोड घडूनही आपला नेता अजूनही बाहेर का निघालेला नाही, असे कार्यकर्त्यांना वाटतेय.
त्यामुळे कार्यकत्यांच्या समाधानसाठी हा दौरा काढला आहे. कार्यकर्त्याला बळ दिले असे यातून दाखवले जाईल. मूळ प्रश्नांना बगल देण्याचा त्यांचा कायमस्वरूपी स्वभाव राहिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी कधीचीव कार्यकत्यांचे मन राखले नाही, त्यांना भेटले नाही. त्यांना गेटच्या बाहेरच ठेवले. प्रश्न सोडवताना आपला नेताच जर आपल्याला बळ देत नसेल तर कार्यकर्ता काय करणार ? २०२२ पासून पक्षात जी फुटाफूट सुरु आहे.
शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल
अयोध्येतील राम मंदिराच्या पैशांचा घोटाळा झाल्याचा आरोप उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या पैशांवर देशाचे राजकारण सुरु असल्याचेही ते म्हणाले होते. यावर शिरसाट म्हणाले, असे म्हणणे बावळटपणाचे लक्षण आहे. राम मंदिराचा हिशेब मागणायचा त्यांना काहीही अधिकार नाही. तुम्ही राम मंदिरात अजून दर्शनासाठीही गेलेले नाही, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? तो अधिकार भक्तांना आहे, यामुळे रामभक्त व्यथित झाल्याचे शिरसाट म्हणाले. तुम्हाला मुंबई महापालिकेचा हिशोब मागितला तर तुम्हाला पळती भुई थोडी होईल अशी टीकाही त्यांनी खा. राऊतांवर केली.
संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे दीना पाटील हे व्यथित झालेले आहेत. या ओघात त्यांच्याकडून पत्रकारांविषयी असभ्य वक्तव्य झाले. याची मी विधानभवनात माफीही मागितली आहे. एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांना समजावले आहे. यावर दीना पाटील यांनी माफीदेखील मागितली आहे. जे घडलं ते रागाच्या भरात घडल्याचे स्पष्टीकरण मंत्री शिरसाट यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनीदेखील याची दखल घेतली असल्याचे ते म्हणाले.