फोटो सौजन्य- pinterest
फाल्गुन हा शालिवाहन शके वर्षातील शेवटचा महिना. तसे पाहिले तर 12 मास आणि सहा ऋतूंचे सोहळे साजरे करताना दिवस कसे सरतात हे समजत नाही, पण शेवटच्या महिन्यातील हा शेवटचा ऋतू आपल्याला हवाहवासा असतो. बदलत्या ऋतुपर्वात येणाऱ्या या महिन्याला वसंतोत्सवाचा महिना म्हणून ओळखले जाते. एकीकडे सरती थंडी आणि हलकेच जाणवणारी उन्हाची चाहूल असते. तसेच धार्मिकतेतूनही या महिन्याचे पावित्र्य वेगळे ठरते.
फाल्गुन या महिन्याला पूर्वी तपस्य या नावाने ओळखत असत, या महिन्यात दररोज रात्रीच्या प्रारंभी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पूर्वेला उगवते तसेच या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला फाल्गुन हे नाव प्राप्त झाले.
या महिन्यात विष्णूला संतुष्ट करण्यासाठी तांदूळ, गाथ, कृष्णाजिन्न, वस्त्रे यांचे दान देण्याची प्रथा आहे. स्कंद पुराणात पुरुषांनी या काळात एकभुक्त राहावे असे सांगितले आहे. या दिवशी भाविक पलंग किंवा बिछाना दान देतात.
फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला, तर नकुल-सहदेव यांचे जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावास्येच्या दिवशी झाले. फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी आणि कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात.
होलिकोत्सव किंवा होळी हा या अखेरच्या महिन्यातला अखेरचा सण या महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. उष्णतेची तीव्रता कमी व्हावी म्हणून अग्निदेवतेचे हे केलेलं पूजन होय. होळी म्हणजे प्रज्वलित अग्नी. हा होलिकोत्सव म्हणजे सर्व वाईट गोष्टीचा नाश.
या वर्षातील सर्व जुनेपाने, वाईट अनुभव, वाईट गोष्टी या अग्नीत जाळून नष्ट करायच्या, भस्मसात करायच्या असाही दृष्टिकोन या सणाच्या बाबतीत ठेवायला हरकत नाही. संपूर्ण वर्षातील चांगले जतन करायचे व वाईटाची आहुती द्यायची. हा अग्नी सर्व वाईट आत्मसात करतो व त्यांचा नाश करतो. अशुद्ध वातावरण शुद्ध करतो. प्रदूषण नाहीसे करतो.
या महिन्यात भारताच्या विविध भागांत वेगवेगळे महोत्सव आयोजित होत असतात. देवळांमध्ये फाल्गुन मासानिमित पूजा-अर्चना संपन्न होतात, फाल्गुन शुक्ल अष्टमीला लक्ष्मीची म्हणजेच सीतेची पूजा केली जाते. फाल्गुनी पौर्णिमेला फाल्गुन नक्षत्र असेल तर हा दिवस विशेष शुभ मानला जातो.
दक्षिण हिंदुस्थानात फाल्गुन पौर्णिमेला उत्तिर नामक महोत्सवाचे आयोजन केले जाते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: फाल्गुन हा शालिवाहन शक वर्षातील शेवटचा महिना मानला जातो. या महिन्यानंतर चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते.
Ans: या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्राजवळ असतो. तसेच रात्रीच्या प्रारंभी हे नक्षत्र पूर्वेला उगवते. त्यामुळे या महिन्याला ‘फाल्गुन’ असे नाव प्राप्त झाले. पूर्वी याला ‘तपस्य’ असेही म्हणत.
Ans: हा महिना व्रत, दानधर्म आणि पूजा-अर्चनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. विष्णूला संतुष्ट करण्यासाठी तांदूळ, वस्त्रे इत्यादींचे दान करण्याची परंपरा आहे. काही धर्मग्रंथांत या काळात एकभुक्त राहण्याचा उल्लेख आढळतो.






