फोटो सौजन्य- pinterest
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतो. याचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. सध्या कुंभ राशीत अनेक ग्रह एकत्र आले आहेत. यावेळी कुंभ राशीत बुध, शुक्र आणि राहू आहेत. १३ फेब्रुवारीला सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर १७ फेब्रुवारीला चंद्रही कुंभ राशीत येणार आहे. चंद्र कुंभ राशीत येताच पंचग्रही राजयोग तयार होणार आहे. याच दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहणही लागणार आहे. पंचग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
दृक पंचांगानुसार, मंगळवार चंद्र १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०५ वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तेथे शुक्र, बुध, राहू आणि सूर्य यांच्यासोबत मिळून पंचग्रही राजयोग तयार होईल. हा योग सुमारे ५४ तासांपर्यंतच राहील, कारण चंद्र एका राशीत साधारण अडीच दिवस राहतो. मात्र, या योगाचा प्रभाव काही दिवस टिकून राहणार आहे. तसेच २३ फेब्रुवारीला मंगळही कुंभ राशीत येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंचग्रही राजयोग तयार होणार आहे.
या राशीच्या गोचर कुंडलीच्या पहिल्या भावात पंचग्रही योग तयार होत आहे. ज्याचा विशेष परिणाम होऊ शकतो, सध्या शनिची साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असला, तरी पंचग्रही राजयोगामुळे चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होणे, आर्थिक प्रगती होणे आणि नशिबाची साथ मिळण्याची जोरदार शक्यता आहे. जीवनात आनंददायी बदल होऊ शकतात आणि कुटुंबातील जुनी अडचण दूर होऊ शकते. आई लक्ष्मीच्या कृपेने धन्धाप्तीचे योग तयार होत आहेत.
धनु राशीच्या लोकांसाठी पंचग्रही राजयोग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या तिसऱ्या भावात हा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते, तुमचा कल अध्यात्माकडेही वाढू शकती, त्यामुळे तुम्ह अनेक धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. करिअरच्या बाबतीत पाहिले तर, तुमच्य मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. तुमच्य कामामुळेच तुम्हाला पदोन्नतीसोबत पगारवाढ मिळू शकते, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी पंचग्रही राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो, य राशीच्या लग्न भावात पंचग्रही राजयोग तयार होणार आहे, त्यामुळे या राशीच्य लोकांना मोठे यश मिळू शकते, नवे मित्र बनू शकतात. करिअरच्या बाबतीत पाहिले तर, या काळात तुम्हाला नोकरीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी दिसू शकता.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार एका राशीत पाच ग्रह एकत्र आल्यास पंचग्रही योग तयार होतो. हा योग दुर्मिळ मानला जातो आणि त्याचा प्रभाव त्या राशीवर व संबंधित भावांवर पडतो.
Ans: शनि हा कर्म, शिस्त, जबाबदारी आणि न्यायाचा कारक ग्रह मानला जातो. त्याच्या राशीत पाच ग्रहांचा संयोग झाल्यास कर्मफळ, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये महत्त्वाचे बदल घडू शकतात, असे मानले जाते.
Ans: शनिच्या राशीत पंचग्रही योगाचा मेष, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल






