सहन सारुखच्या पत्नीने या बाळाला अंघोळ घातली. हे बाळ सहनसारुखला नर्मदानदी किनारी सापडलं. त्याची पत्नी म्हणाली की, हे बाळ नर्मदेच्या किनारी सापडलं. नर्मदेला पुराणकथांमध्ये रेवा असं नाव आहे. त्यामुळे रेवाकिनारी रेतीत सापडलेला बालक म्हणून रेवण असं या बाळाच नाव ठेवण्यात आलं. सहन सारुख आणि त्याच्या पत्नीने या बाळाचं पालकत्व स्विकारलं. सहन सारुख शेतकरी असल्यामुळे वयात आल्यावर रेवण देखील वडिलांबरोबर शेतीची कामं करायला जात असायचा.
नदीच्या किनारी अवतरला दिव्य बालक
एकदा रेवण शेतात जात होता. हा तोच रस्ता होता जिथून श्रीदत्तगुरु गिरनार पर्वाताकडे मार्गक्रमण करत होते. त्यांना वाटेत रेवण दिसला. दत्तगुरुंनी या बालकाला ओळखलं. रेवणला दत्तगुरुंनी महिमा सिद्धीचा मंत्र दिला. रेवण शेतात काम करत असताना त्या मंत्राचा जप करीत असे. त्यामुळे झालं असं की, रेवणला सिद्धी प्राप्त झाली. रेवणने वर मागितला की, माझ्या कुटुंबाच दारिद्र्य दूर व्हावं. रेवणची ही प्रार्थना फळाला आली. सहससुख आणि त्याच्या पत्नीला सुखाचे दिवस मिळाले. असं म्हटलं जातं की, रेवण हा महादेवांचा अंश होता. लहानपणापासूनच रेवणला अध्यात्माची ओढ होती. रेवणचा जन्म हा देखील दैवी संकेत होता. जसं वय वाढलं तसं दत्तगुरुंच्या योजनेप्रमाणे रेवणला नाथसंप्रदायाचं मार्गदर्शन लाभलं आणि दत्तगुरुंच्याच आशिर्वादाने लोककल्य़ाणासाठी रेवण नाथ संप्रदायाशी जोडला गेला. आणि त्यामुळेच रेवण हा बालक पुढे रेवणनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले.






