फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तर देवी वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन येते. देवीच्या आगमनाच्या वेळी आणि प्रस्थानाच्या वेळी वाहन कोणते असेल आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ते जाणून घ्या.
प्रत्येक वेळी देवीचे आगमन आणि प्रस्थान वेगवेगळे असते. यंदा नवरात्रीची सुरुवात सोमवार, 22 सप्टेंबरपासून होत आहे. या वेळी घटस्थापना केली जाणार आहे. यंदा नवरात्रीचा उत्सव 10 दिवस चालणार आहे. यंदा देवीचे आगमन हातावर होणार आहे.
नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. हा काळ भक्ती, तपश्चर्या आणि आत्मशुद्धीचा मानला जातो. या काळात लोक उपवास करतात, मंत्रांचे जप करतात. त्यासोबतच धार्मिक विधी देखील केले जातात. यावर्षी देवी हत्तीवर बसून आगमन आणि मानवी खांद्यावर बसून प्रस्थान होणे हे शुभ मानले जाते. ज्याचा संबंध समृद्धी, आनंद आणि शांतीशी संबंधित आहे. गेल्यावर्षी देवीची सवारी अशुभ दर्शवत होती मात्र यंदा देवीची सवारी शुभ मानली जाते.
नवरात्रीमधील हा पवित्र सण भक्तांना शक्ती, धैर्य आणि आशीर्वाद देतो. यावर्षासाठीचे देवीचे आगमन आणि प्रस्थान भक्तांसाठी सकारात्मक आणि शुभ असणारे आहे.
देवीचे आगमन आणि प्रस्थान दिवस आठवड्यानुसार ठरवले जाते. हत्ती किंवा गजावर देवीचे आगमन होणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, ज्यावेळी देवी हत्तीवर स्वार होऊन येते त्यावेळी सुख, समृद्धी, व्यवसाय आणि शेतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. जर देवीचे आगमन रविवार किंवा सोमवारी होत असल्यास शेती, संपत्ती आणि समृद्धीसाठी ते शुभ मानले जाते.
जर देवी राणींच्या प्रस्थानाबद्दल बघायला गेल्यास राणी एका मानवाच्या खांद्यावर निघून जातील. माता राणींचे प्रस्थान गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्यांचा संबंध आनंद, शांती, व्यवसायात वाढ आणि शेजारील देशांशी आहे आणि त्याला त्याचे प्रतीक मानले जाते.
हत्तीवर देवीचे आगमन आणि निघून जाणे याचा मानवाच्या खांद्यावर शुभ परिणाम होणारा आहे. एकंदरीत, हे सुख, समृद्धी, शांती आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. याचा कोणताही मोठा अशुभ परिणाम होत नाही; उलट येणाऱ्या काळात ते शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)