फोटो सौजन्य- pinterest
गणपती बाप्पाच्या पूजेसाठी विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे. गणेश चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. आज सोमवार, 20 एप्रिल रोजी विनायक चतुर्थी आहे.
विनायक चतुर्थीची सुरुवात रविवार, 19 एप्रिल रोजी सायंकाळी ६:५७ वाजता झाली आणि या तिथीची समाप्ती सोमवार, 20 एप्रिल रोजी दुपारी ३:४५ वाजता होईल. यामुळे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीच्या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सोमवार, 20 एप्रिल रोजी सकाळी ११:४८ ते दुपारी २:२८ पर्यंत (अंदाजे २ तास ३९ मिनिटे)
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर
पूजा मांडणी घरातील देवाऱ्यात किवा चौरंगावर गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. चौरंगावर पिंजरीने आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. गणपतीच्या मूर्तीला जल अर्पण करून अभिषेक करावा, चंदन, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. त्यानंतर गणपतीला प्रिय असलेली जास्वंदाची फुले, दुर्वा आणि मोदक/लाडूचा नैवेद्य दाखवावा. नंतर मंत्र व स्तोत्र अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे वाचन करावे, गणपतीच्या मंत्रांचा जप करावा. आरती करावी. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी फलाहार करावा.
प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. विनायक या शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित नायक असा होतो. असे मानले जाते की विनायक चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाळात गणेश पूजन केले जाते. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्हच्या वेळी म्हणजेच दुपारी सोडला जातो. गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाच्या जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे. सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते यामुळे विनायक चतुर्थीच देखील वेगळं महत्त्व आहे. विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी देणारी आहे.
जी व्यक्ती विनायक चतुर्थीचा उपवास करतो त्याला सर्व कामामध्ये यश आणि सिद्धी मिळते. कुंडलीतील राहू केतू दोष दूर होतात. नोकरी, परीक्षा, लग्न, मुले, न्यायालयीन प्रकरणे इत्यादी कामातील सर्व अडथळे दूर होतात. गणपती बाप्पाच्या कृपेने घरात सुख, शांती, समृद्धी आणि बालसुख प्राप्त होते
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते.
Ans: जीवनातील अडथळे दूर होतात, बुद्धी आणि यश प्राप्त होते, आर्थिक स्थितीत सुधारणा होते
Ans: सकाळचा शुभ मुहूर्त आणि विशेषतः मध्यान्ह काळ (मध्यान्ह काल) गणेश पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.






