फोटो सौजन्य- pinterest
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्यात काही बदल होत असतात आणि त्यानुसार आपली श्रद्धाही बदलत जाते. आयुष्याच्या एका टप्प्यावरती हनुमान हे अगदी जवळचे वाटू लागतात. त्यांचे अस्तित्व हे आपल्यासाठीच आहे असेही वाटू लागते. मारुती रायांची गरज तुम्हालाही वाटते म्हणजे तुम्ही कठीण प्रसंग, भीती, तणाव किंवा आयुष्यातील मोठ्या अडचणींमध्ये मानसिक आधार शोधत आहात आणि त्यामुळेच हनुमानाकडे वळतात. हनुमानांना धैर्य, शक्ती आणि संकटमोचक देवता मानलं जातं. त्यामुळे मन फसलेलं असताना त्याच्यावरील श्रद्धा अधिक रुढ होत जाते. तुम्हालाही मनापासून मारुती रायांची भक्ती करण्याची इच्छा असेल तर फार काही देखावा न करता करू शकता.
मारुती ही देवता तिच्या साधेपणासाठी आणि प्रभू रामांवर असलेल्या भक्तीसाठी ओळखली जाते. जर तुम्हालाही मारुती रायांच स्मरण करून मनाला शांत आणि संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळवायचं असेल तर नित्यनियमाने हनुमान चालिसा पठण करायला घ्या ते शक्य नसल्यास अगदी मनापासून शांत चित्याने ‘ॐ हनुमते नमः, ॐ रामदुताय नमः या मंत्रांचा पठण करा. जर तुम्ही प्रभू रामांची स्तुती केली तर अशा ठिकाणी हनुमंत तर येणारच त्यामुळे तुम्ही रामरक्षा देखील वाचा. त्याने देखील तुम्हाला हनुमानाचा सहवास लाभेल.
ज्या लोकांना नेहमी चिंता, असुरक्षितता किंवा मानसिक तणाव जाणवतो, अशा लोकांनी हनुमानाचे स्मरण करावे. त्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी हनुमतांचे स्मरण केल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो, असे देखील म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी हनुमान चालीसा पठण करावी. तसेच ज्यांना कामात अडथळे, आर्थिक समस्या किंवा निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत अशा लोकांनी हनुमंताचे नामस्मरण करणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शनिदोष किंवा मंगळदोष आहे अशा लोकांनी स्मरण केल्याने या दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पठण करावे
“ॐ हं हनुमते नमः” या मंत्राचा जप करावा
मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्यावे
श्रीराम नामाचा जप करावा
गरजू लोकांना मदत आणि अन्नदान करावे
मारुतीचे स्मरण करताना तुमच्या मनात धैर्य, नम्रता, सेवाभावना आणि प्रभू श्रीरामांची भक्ती असणं फारचं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही संकटांत सापडला असाल तरी देखील तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचं बळ फक्त हनुमानाकडूनच मिळू शकतं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हनुमंताचे स्मरण धैर्य, आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी केले जाते, अशी श्रद्धा आहे.
Ans: भगवान हनुमान भक्तांच्या संकटांचे निवारण करतात आणि अडचणींमध्ये मार्गदर्शन करतात, अशी धार्मिक मान्यता असल्यामुळे त्यांना संकटमोचक म्हटले जाते.
Ans: विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे, मानसिक तणाव असलेले लोक आणि नकारात्मकतेपासून दूर राहू इच्छिणारे लोक हनुमंताचे स्मरण करतात.






