• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Childrens Day Is Celebrated On November 20th In The World But On November 14th In India

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?

Children's Day 2025 : दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन (बालदिन 2025) म्हणून साजरा केला जातो. शाळा आणि महाविद्यालये या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 14, 2025 | 08:08 AM
Children's Day is celebrated on November 20th in the world but on November 14th in India

Children's Day 2025 : जगात २० नोव्हेंबरला पण भारतातच १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  1. भारत १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतो कारण हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन असून त्यांचे मुलांवर अपार प्रेम होते.
  2. जगभरात २० नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय बालदिन साजरा केला जातो, कारण त्या दिवशी यूएनने ‘बालहक्क जाहीरनामा’ स्वीकारला होता.
  3. बालदिनाचा मुख्य उद्देश मुलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढवणे, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि बालकल्याणाच्या समस्यांवर चर्चा घडवून आणणे हा आहे.

Children’s Day 2025 : दरवर्षी १४ नोव्हेंबरला भारतभरात आनंद, उत्साह आणि हास्याने भरलेला बालदिन (Children’s Day)  साजरा केला जातो. शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी विशेष उपक्रम आणि शिक्षणासोबत मजा हा दिवस सर्वच मुलांसाठी खास बनवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जग २० नोव्हेंबरला बालदिन साजरा करत असताना भारत मात्र १४ नोव्हेंबरलाच का करतो? ही तारीख केवळ निवडलेली नाही, तर तिच्यामागे एक इतिहास, एक भावना आणि एका महान नेत्याचे मुलांवर असलेले निस्सीम प्रेम दडलं आहे.

भारतात १४ नोव्हेंबरलाच बालदिन का?

१४ नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. नेहरूंना मुलांवर अफाट प्रेम होतं. ते म्हणत असत,
“आजची मुले म्हणजे उद्याचा देश.” त्यांच्या दृष्टीने मूल म्हणजे एक कोरी पाटी नव्हती, तर भविष्यातील एक सक्षम नागरिक. ते मुलांना वेळ देत, त्यांच्यासोबत खेळत, त्यांच्या प्रश्नांना महत्त्व देत. मुलांच्या डोळ्यांतील उत्साह त्यांना प्रेरणा देत होता. मुलांवरील या अपार प्रेमामुळेच त्यांनी देशभरात शिक्षण, बालकल्याण आणि युवा विकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यांच्या प्रेमामुळेच मुले त्यांना “चाचा नेहरू” म्हणून ओळखू लागली. नेहरूंनंतर देशाने त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जन्मदिवशी बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला जो आजही परंपरेने चालू आहे.

हे देखील वाचा : सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा

 मग जग २० नोव्हेंबरला बालदिन का साजरा करते?

जगभरात २० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९५४ मध्ये हा दिवस मुलांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी निश्चित केला. या दिवशीच १९५९ मध्ये “बालहक्क जाहीरनामा” स्वीकारण्यात आला आणि पुढे १९८९ मध्ये “बालहक्क करारनामा” मान्य करण्यात आला. त्यामुळे हा दिवस जागतिक पातळीवर बालसंरक्षण आणि बालकल्याणाच्या चर्चांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. भारतही २० नोव्हेंबर रोजी विविध सरकारी आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी होतो. मात्र, मुलांचा मुख्य उत्सव कार्यक्रम, सांस्कृतिक साजरेपण १४ नोव्हेंबरलाच पार पडते.

 बालदिन साजरा करण्यामागील खरा उद्देश

बालदिन हा केवळ मजा, खेळ आणि शाळेतील कार्यक्रमांचा दिवस नाही. ह्या दिवसाची मुळ भावना खूप मोठी आहे.

1. मुलांच्या हक्कांबद्दल जागरूकता

शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, समान संधी ही प्रत्येक मुलाची मूलभूत हक्क आहेत. बालदिन समाजाला याची आठवण करून देतो की मुलांचे संरक्षण आणि प्रगती हीच देशाची खरी प्रगती आहे.

2. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे

चाचा नेहरूंचे स्वप्न होते की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, कोणतेही मूल शिक्षणाच्या अभावामुळे मागे राहू नये. हा दिवस त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतो.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….

3. बालप्रतिभेला वाव देणे

शाळांमधील चित्रकला, भाषण, निबंध, नृत्य, खेळ या स्पर्धा मुलांची लपलेली क्षमता बाहेर आणतात. या क्रियाकलापांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.

4. बालकल्याणावरील गंभीर मुद्द्यांवर चर्चा

बालकामगार, कुपोषण, बालविवाह, अत्याचार या समस्या समाजासाठी आजही आव्हान आहेत. बालदिन या समस्यांवर उपाय शोधण्याची उत्तम संधी ठरते. बालदिन हा फक्त एक उत्सव नसून तो मुलांच्या उज्ज्वल भविष्याची, त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या विकासाची हमी देणारा दिवस आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस नेहरूंच्या प्रेमाची आठवण तर करून देतोच, पण देशाला हेही सांगतो की प्रत्येक मूल हा देशाचा उजेड आहे.

Web Title: Childrens day is celebrated on november 20th in the world but on november 14th in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 08:08 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special story
  • Pandit nehru

संबंधित बातम्या

Dr. Zakir Hussain: ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध
1

Dr. Zakir Hussain: ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhurandhar 2 आणि Toxic चा प्रदर्शनाआधीच धबधबा; रणबीरच्या Love & War ने पुढे ढकलली रिलीज डेट

Dhurandhar 2 आणि Toxic चा प्रदर्शनाआधीच धबधबा; रणबीरच्या Love & War ने पुढे ढकलली रिलीज डेट

Feb 15, 2026 | 11:20 AM
IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

Feb 15, 2026 | 11:18 AM
सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

Feb 15, 2026 | 11:16 AM
Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 15, 2026 | 11:10 AM
Hatkanangale Gram Panchayat Election 2026:  हातकणंगले तालुक्यातील ‘या’ २१ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजणार

Hatkanangale Gram Panchayat Election 2026:  हातकणंगले तालुक्यातील ‘या’ २१ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजणार

Feb 15, 2026 | 11:01 AM
Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

Uttarpradesh Crime: वीटभट्टी मालकासह तिघांकडून कामगार महिलेवर 12 तास अत्याचार; पोलिसांकडून फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 10:56 AM
‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Feb 15, 2026 | 10:52 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.