डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले (फोटो - टीम नवराष्ट्र)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या समाजनिर्मितीमध्ये बहुमुल्य योगदान दिले. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर यांना देशाची प्रगती आणि भेदभाव नसलेल्या समाजासाठी अथक प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि आयुष्यभर सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा दिला. दलित समाजाच्या हक्कासाठी त्यांनी आवाज उठवला. देशासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 31 मार्च 1990 रोजी त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा