फोटो सौजन्य - Social Media
मुंबईच्या जवळ कोणत्या सोप्या ते माध्यम श्रेणी मध्ये मोडणाऱ्या किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत आहात तर बोईसर जवळ स्थित असलेल्या ‘आसावा’ किल्ल्याला नक्की भेट द्या. या किल्ल्याचे नाव इतके प्रसिद्ध नसले तरी या किल्ल्याचा इतिहास मोठा आहे आणि येथे असणारा निसर्ग अगदी पाहताच क्षणी प्रेमात पाडते. हा किल्ला डोंगराळ आहे. या किल्ल्याची उंची 1000 ते 1100 फुटांपर्यंत आहे. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा गणला जाणारा किल्ला पालघर बोईसर मार्ग तसेच आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी कामी येत होता. डहाणू, वैतरणा तसेच पालघर शहराच्या आसपासची शहर, गाव आणि ठिकाण या किल्ल्यावरून नीट दिसतात.
मुळात, हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेच्या अगदी उत्तरेकडील टोकावर आहे. या किल्ल्यावरून आसपासचे किल्ले जसे की तांदुळवाडी, काळदुर्ग तसेच अशेरी किल्ल्याचे दर्शन घडते. वाटचटॉवर म्हणून या किल्ल्याचा वापर त्याकाळी केला जात असे. किल्ल्याचा वापर प्रामुख्याने संरक्षण आणि संपर्क राखण्यासाठी होत होता. तसेच आसपासच्या किल्ल्यांमध्ये संपर्क ठेवण्याचे काम या किल्ल्यावर केले जात असे. महत्वाच्या किल्ल्यांमधील दुआ म्हणून हा किल्ला ओळखला जात होता. आज हा किल्ला राज्यातील बहुतेक किल्ल्यांप्रमाणे कोसळला आहे. पण पूर्वी याठिकाणी तटबंदी आणि बांधकाम होते, हे येथील अवशेषांवरून लक्षात येते.
आसावा या किल्ल्यावर आता एक चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तसेच येथे पाण्याच्या टाक्या देखील आहेत. या डोंगरवारून 360 दृश्य पाहता येतात, आसपासचे परिसर जस की पालघर, बोईसर, वैतरणा आणि मनोर सारखे शहर आणि ठिकाण अगदी स्पष्ट दिसतात. वरून निसर्ग त्याचे सुंदर रूप दाखवतो. जंगल, नद्या तसेच डोंगर दिसतात. वरून दिसणारा सूर्यास्त अतिशय सुंदर आहे, लांब वाहत जाणारी वैतरणा नदी वरून फार सुंदर दिसते. फक्त 2 ते 4 तासांचा ट्रेक करत तुम्ही या किल्ल्याला सैर करू शकता. वरांगडे/आसावा गावातून या किल्ल्याला जाता येते, या गावात जाण्यासाठी मुंबई उपनगरीय पश्चिम रेल्वेमध्ये येणाऱ्या बोईसर रेल्वे स्थानकावर उतरा आणि या किल्ल्याच्या बेसगावात जाणारी ऑटो पकडा. मुंबईपासून हा किल्ला साधारण 100 किमी दूर आहे.






