वैभव सूर्यवंशी भारताकडून खेळणार? (फोटो- सोशल मिडिया)
वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये डेब्यू करण्याची शक्यता
आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत निवडीची शक्यता
कालच्या सामन्यात वैभवने ठोकले वादळी अर्धशतक
India Vs Ireland T20 Series: सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. 28 मार्चपासून आयपीएल सुरू झाले आहे. दरम्यान आयपीएल सुरू झाल्यापासून वैभव सूर्यवंशीचे नाव सातत्याने चर्चेत होते. त्यांच्या फलंदाजीची सगळीकडे चर्चा सुरू होती. काल झालेल्या सामन्यात त्याने वादळी खेळी केली. त्यानंतर वैभव सूर्यवंशी भारतीय संघात खेळण्यासाठी तयार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. लवकरच वैभव सूर्यवंशी भारतीय संघात खेळताना पाहायला मिळू शकतो.
भारतीय संघ जून महिन्यात आयर्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्या मालिकेत वैभव सूर्यवंशीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 26 जून रोजी सुरू होणाऱ्या या मालिकेतून वैभव सूर्यवंशी भारतीय संघात डेब्यू करण्याची शक्यता आहे. कल झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
भारतीय टी-20 संघात वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्ध संधी मिळू शकते. भारताचा संघ आयर्लंडविरुद्ध खेळून झाल्यावर इंग्लंडविरुद्ध वनडे सिरिज खेळणार आहे. त्यानिमित आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वरिष्ठ खेळाडूना विश्रांती दिली जाऊ शकते. असे झाल्यास वैभव सूर्यवंशी भारताकडून खेळण्याची शक्यता दिसून येत आहे.
CSK ला 15 वर्षांच्या पोराने रडवलं! ‘वैभव’ सूर्यवंशीचा गुवाहाटीत राडा; RR चा दणदणीत विजय
RR च्या सूर्यवंशीने दाखवले ‘वैभव’
कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला 128 धावांचे लक्ष्य दिले होते. दरम्यान राजस्थानकडून युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्सचा चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. 52 धावा करून वैभव सूर्यवंशी बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्सकडून प्रथम संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 6 धावा करून बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील 6 धावा करून बाद झाला. तसेच युवा फलंदाज आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मॅथ्यू शॉर्ट केवळ 2 धावा करून बाद झाला. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार रियान परागने 14 धावा करून संघाला विजय प्राप्त करून दिला. यशस्वी जयस्वालने नाबाद 38 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगला खेळ केल्याचे पाहायला मिळाले.






