अभिषेक शर्माचे वैभव सूर्यवंशीवर भाष्य (फोटो- सोशल मीडिया)
भारत अन् आयर्लंडच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत. सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी अय्यर आणि गंभीरवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीवर भाष्य केले आहे.
काय म्हणाले अभिषेक शर्मा?
सामना संपल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक शर्माला वैभसव सूर्यवंशीबाबत प्रश्न विचारण्यात आला. वैभवला या संघात मिसळता यावे, त्याला चांगले वातावरण मिळावे ही आमची जबाबदारी आहे. तो युवा आहे. प्रत्येक वेळेस तो खेळण्यासाठी उत्सुक असतो. तो एकसारखे अनेक प्रश्न विचारत असतो, यावरून त्याला शिकण्याची किती ओढ आहे हे समजून येते.
Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले
Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं?
काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला मिळाले. आयपीएल 2026 आणि ट्राय सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली होती. तरी देखील त्यांना संधी देण्यात न आल्याने चाहते आणि क्रिकेटमधील अनेक दिग्गज नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. २८ जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात आता टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी विजय अनिवार्य आहे. पराभवानंतर संघात काही बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण
श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का?
कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. काल त्याने इंटरनॅशनल डेब्यू केले असते तर कमी वयात डेब्यू करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड त्याने मोडला असता. मात्र आटा पुढील सामन्यात तरी श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.






