
IND vs PAK: What if the India-Pakistan final match is cancelled due to rain? Who will win the Asia Cup trophy? Read in detail
आशिया कप २०२५ स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही सामन्यात पावसाने व्यत्यय आलेला नाही. सर्व सामने व्यवस्थित पार पडले आहेत. पण काही क्रिकेट प्रेमींना असा प्रश्न पडला आहे की, अंतिम सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला तर या स्पर्धेचे विजेतपद कुणाला मिळेल? या प्रश्नाचे उतर आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, जर हवामान किंवा इतर अडथळ्यांमुळे सामना रद्द झाला, तर ट्रॉफी दोन्ही अंतिम स्पर्धकांमध्ये वाटण्यात येईल.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा सरल अर्थ असा की जर सामन्यात पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे व्यत्यय निर्माण झाला तर राखीव दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी विजेता संघ निश्चित करण्यात येईल.
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.