india vs sri lanka (फोटो -ट्विटर)
भारताने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. मात्र श्रीलंकेने भारताला १९३ रन्सवर ऑल आउट केले. यावेळी भारताने श्रीलंकेला ३७२ रन्सचे टार्गेट दिले होते. श्रीलंकेकडून फलंदाजीची सुरुवात निशान मदुष्का आणि लाहिरू उदारा यांनी केली. सलामीआया खेळण्यासाठी आलेल्या या दोन फलंदाजांनी निराशा केली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी ६ आणि १६ रन्स करून आउट झाले.
Wicket number 2⃣ for Manav Suthar! A sharp catch by Dhruv Jurel at gully 👏👏 Sri Lanka lose their 4th wicket Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/41CRi1DBLn — BCCI (@BCCI) August 18, 2026
त्यानंतर बदली खेळाडू म्हणून डेब्यू केलेल्या पासिनदू सूर्यबंदरा देखील निराशाजनक कामगिरी करून गेला. तो पहिल्याच बॉलवर शून्यावर आउट झाला. त्यामुळे श्रीलंकेने अत्यंत वेगाने ३ विकेट्स गमावल्या. कामिंदू मेंडिस देखील रन्स करून आउट झाला. मात्र कर्णधार धनंजय डी सिल्वाने श्रीलंकेची बाजू सांभाळून धरली आहे. तो ३० रन्सवर खेळत आहे. सोनल दिनुशा तर १९ रन्सवर आउट झाला.
या कसोटी सामन्याचा उद्या शेवटचा म्हणजेच पाचवा दिवस आहे. त्यामुळे श्रीलंकेला हा सामना जिंकायचा असेल तर २९४ रन्सची गरज असणार आहे. तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी ६ विकेट्सची गरज असणार आहे. भारताने दुसऱ्या डावात भेदक मारा करत अचूक गोलंदाजी केली आहे. मानव सुथारने महत्वाच्या २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…
भारत अन् श्रीलंकेच्या संघांमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाता हे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत दोन्ही संघांसाठी ही सिरिज महत्वाची असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ ही सिरिज जिंकण्यासाठी मैदानात प्रयत्न करताना दिसून येत आहे. देवदत्त पडीकलने शानदार खेळी केली आहे. दरम्यान उद्या शेवटचा दिवस असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळतील.



