
टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. ग्रास आयलेट स्टेडियमवर २०२४ च्या टी-२० विश्वचषकात रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावा केल्या. टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच टीम इंडियाकडून कर्णधार म्हणून खेळणारा सूर्यकुमार यादव आता या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने या यादीत आधी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीला मागे टाकले. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ५७ धावा केल्या.
रोहित शर्मा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावा (२०२४)
सूर्यकुमार यादव – अमेरिकाविरुद्ध ८४ धावा (२०२६)
विराट कोहली – पाकिस्तानविरुद्ध ५७ धावा (२०२१)
एमएस धोनी – दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ४५ धावा (२००७)
सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरुद्ध नाबाद ८४ धावा करून बाबर आझमला मागे टाकले. कर्णधार म्हणून टी-२० विश्वचषकात पदार्पणात कोणत्याही खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. २००९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावा करून ख्रिस गेलने यादीत अव्वल स्थान पटकावले. सूर्यकुमार यादव आता यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ८८ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००९)
सूर्यकुमार यादव (भारत) – ८४ धावा विरुद्ध अमेरिका (२०२६)
बाबर आझम (पाकिस्तान) – ६८ धावा विरुद्ध भारत (२०२१)
महेला जयवर्धने (श्रीलंका) – ६५ धावा विरुद्ध केनिया (२००७)
मोहम्मद अश्रफुल (बांगलादेश) – ६१ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज (२००७)