
photo- social media
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी भारतीय संघाच्या टी-२० संघात निवड झाल्यापासून वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैभवची एक व्हिडिओ शेअर केली आहे. या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना वैभव म्हणाला की, ‘मी इथे फक्त खेळायला आलेलो नाही, तर मला अशा प्रकारचं क्रिकेट खेळायचं आहे की, ज्यामुळे मला पुढील १० ते २० वर्षे क्रिकेटवर वर्चस्व गाजवता येईल. आयपीएल दरम्यान जेव्हा विराट कोहलीने माझ्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा मला खरंच स्वप्न पडत आहे असे वाटले.’
तो पुढे म्हणाला की, ‘जर मी २० वर्षे कोणत्याही संघाकडून क्रिकेट खेळलो, तर सामना पाहिल्यानंतर लोकांनी म्हंटल पाहिजे की, एक असाही खेळाडू होता जो एकहाती सामना जिंकवायचा. मला अशा प्रकारचे वर्चस्व गाजवायचं आहे. असं होता कामा नये की, मी फक्त खेळलो आणि सामना संपला. मला असं क्रिकेट खेळायचं आहे की, पुढील १० ते २० वर्षे मी चांगले क्रिकेट खेळेन आणि माझे वर्चस्व टिकवेन. यासाठी मी कठीण परिश्रम देखील घेत आहे.मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण मला तो खेळ आवडतो आणि मला आयुष्यभर या खेळाचा आनंद घ्यायचा आहे.’
टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर वैभवला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही मान्य केले की, वैभवच्या कामगिरीमुळेच निवड समितीला त्याला संघात स्थान द्यावे लागले. आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, वैभवने १६ डावांमध्ये २३७ च्या स्ट्राइक रेटने ७७६ धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली. त्याने या स्पर्धेत एकूण ७२ षटकार मारून ख्रिस गेलचा विक्रम मोडला.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना शुक्रवार, २६ जून रोजी खेळला जाईल, ज्यामध्ये वैभव पदार्पण करण्याची शक्यता आहे. वैभवने आतापर्यंत ३४ टी-२० सामन्यांमध्ये १,४७७ धावा केल्या आहेत, तर आठ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ३५३ धावा आहेत.
French Open 2026 : मीरा आंद्रीवाने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी जिंकले पहिले ग्रँड स्लॅम